श्री विठ्ठल – देही अन् विदेही बनवितो कोण? अज्ञानी मानवांना हे काही समजू शकणार नाही. सत तत्व जे आहे, ते फार दयाघन आहे. जडत्वाने नटलेल्या मानवांना ह्याचे पूर्वीचे गाठोडे पाहून सानिध्यात घेतले आहे. कोणत्याही मानवाची मनोभावना असते, भक्ती करतो, नामस्मरण करतो, ते मी करतो. यातूनही परमेश्वर मला भेटत नाही, म्हणून परमेश्वर हे तत्व कोठे आहे अन् कोठे नाही हे त्या अज्ञानाना कळले असते तर ते भटकत फिरले नसते. याचे ज्ञान नाही म्हणून, काशी, बनारस, मथुरा, प्रयाग इकडे तिकडे भटकतो. पंढरीला जातो. आणखी दुसरीकडे जातो. दत्ताच्या ठिकाणी जातात. पण दत्त कोण हे त्याला कळले नाही. कोणाच्या सत्तेने जातो, हे पण त्याला कळलेले नाही. मला पण कळत नाही. मानवाला याची गती मिळाली, तर पंढरी सोडून मी येथे आलो ते खरे की खोटे याची गती मानवाने घेतली पाहिजे. बरे, मी या ठिकाणी आलो ही गती ज्ञानवंतानी घेतली. तर हे ज्ञान मिळते कुठून? तर सद्गुरु कृपेने ते मिळते. मग या रस्त्याने जाणारे सेवेकरी, ज्ञानरूपी दरीत घुसल्या नंतरची ही जाणीव आहे. पण पंढरीला येतात त्यांनी मला पाहिले आहे का? अंधश्रद्धेचेच लोक जास्त असतात. काही लोक मूर्तीच्या दर्शनासाठी लोकांचे सोटके खातात. काही तर पुढे पण येत नाहीत. मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी जास्त गर्दी असते. धक्का बुक्की होते, मार खावा लागतो. पण विठ्ठल कुठे आहेत, हे कोणी पाहिले आहे का? मग जर हे कळत नाही, मग माळा घालण्यात अन तिला लावण्यात अर्थ तरी काय आहे? उपयोग काय? जितके माळ घालणारे, ते एकून एक शुद्ध नाहीत. ©️
हल्लीचा मानव अतिशय अहंकारी झाला आहे. त्याला गुरुपद कळलेले नाही. गुरुपद म्हणजे आकार आला, मानवाला त्याची सेवा करायला त्रासदायक होते, मग त्याला …
