Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

डोळस व्हा, नादातीत व्हा …©️

डोळस व्हा, नादातीत व्हा …©️

श्री समर्थ मालिक – आरतीचे वेळेला सर्व सेवेकरी ललकारी म्हणतात, तिचा अर्थ सेवेकऱ्यांनी केला तर कळेल. ॐ कार बीज मात्रेन नित्यं ध्यायंती योगिन: | कामदम् मोक्षदम् चैव ॐ काराय नमो नमः ||

हा कोण याची ओळख करून, स्वतःची दृष्टी हि तेजोमय करून योग्याला पाहण्याचा प्रयत्न करा. तो योगी कुठे आहे, हे सेवेकर्‍यांनी विसरता उपयोगाचे नाही. सर्वस्व सांगितले तरी, सेवेकऱ्यांच्या लक्षात राहील कि नाही कोण जाणे? पण मायावी लगट लवकर ध्यानात राहते, म्हणून, होते ते चांगल्यासाठीच होते.

काही सेवेकरी आपल्या कर्तव्यात तल्लीन होते. तत्वापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे. सेवेकऱ्याला पाहता आले नाहीत तरी क्षमा आहे. सेवेकऱ्याने एकाच तत्वाने आपल्या प्रकृतीचा उजाळा करणे हे संदेश आहेत.

दिलेली तिजोरी भरपूर झाली की प्रकृतीचा उजाळा लवकर होतो. नामस्मरण हे साधे सोपे नाही. रस्त्याने चालला तरी लहर लागली पाहिजे. लहर लागली तर पावलोपावली चमत्कार करीन. पण सेवेकरी त्याने हुरळून जाईल. परंतु सेवेकर्‍याची मनोभावना तशी झाली, तर हे करावे लागते.

सर्व सूत्राची दोरी माझ्या आधीन आहे. काही डोळस आहेत, काही नादातीत आहेत. डोळस म्हणजे सानिध्यात घेतलेले, नादातीत म्हणजे उपासना करणारे. पण त्यांना दाखवणारा पाहिजे, म्हणजे हे नादातीत डोळस होतील. तेव्हा त्यांना समजेल. पंजा मस्तकावर पडला कि ते डोळस होऊन त्या मार्गाने जातील. अशा तऱ्हेने त्यांना भक्तीची खूण सापडली की मग ते सत् भक्तीच्या गतीने जातील. मग मात्र तीर्थ करण्याची अगर क्षेत्रे भटकण्याची आवश्यकता नाही. ©️

You cannot copy content of this page