Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जो माझ्यात रममाण होतो…©️

जो माझ्यात रममाण होतो…©️

श्री समर्थ मालिक – सेवेकरी असून कर्तव्याची दिशा चुकला गेला तर आसनाने आसनाधिस्तांनी त्याच्यासाठी वशिला लावू नये. जो सात्विक असतो, तो रस्ता चुकत नाही, पण तो मनाचे आधीन झाल्यानंतर तोच रस्ता चुकतो, तेव्हा त्याला मार्गावर आणण्या करीता चुणूक दाखवावी लागते.

या २०-२५ वर्षाचे काळात चमत्कार, नमस्कार कितीतरी दाखविले आहेत. ज्यांनी हे चमत्कार पाहिले, त्यापैकी किती ज्योती या ठिकाणी रममाण झाल्यात? तर काही ठराविकच ! हे जरी खरे असले तरी पण रममाण कोणाला करून घ्यावयाचे आणि कोणाला नाही हे मला माहीत आहे.अन् हीच स्थिती येथे झालेली आहे.

येथील काही मानव मतलब साधण्यासाठीच सेवेकरी झालेले आहेत. काही ज्योती सोडल्यास बाकी ज्योती जागृत आहेत का? ज्या कर्तव्यासाठी संदेश सोडले, त्या कर्तव्याचे पालन झाले आहे का?

या सबंध वालावल भूमीमध्ये ज्यांनी आसनाची विटंबना केली, त्यांना त्याचे प्रायश्चित्त भोगायला लावी़नच लावीन. पण केव्हा आणि कधी? आसनाचे खोटे नाटे, इकडचे तिकडे कोण करीत आहे हे पण मला माहित आहे. त्यांना नाचायला लावीन.

काही सेवेकरी असे आहेत की ते अति प्रेम दाखवितात. त्यासाठी दाढी कुरवाळतात. तरी वरुन सेवेकर्‍यांनी दाढी धरावयाची व खाली पायाने तुडवावयाचे, मग दर्शन घेण्याचा अर्थ काय? तर हे कशासाठी करतात? मतलब साधण्यासाठी? पण तो मतलब साधू देणार नाही. या मानवानां त्राही त्राही करून सोडेन.

एकच ज्योत, तिच्या कर्म संचिताप्रमाणे होईल. पण तिच्या कर्मसंचिता पेक्षाही उज्वल ठिकाण मिळवून देईन. मानवाने काय कमवायचे? तर सत् कृती ! ज्याने सत् कमावले, त्याचा केसही वाकडा करू देणार नाही. जो माझ्यात रममाण होतो, मीही त्या ठिकाणी रममाण होतो. ©️

You cannot copy content of this page