Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जगाच्या उत्पत्ती पासून ॐ या बिजाचे बिजारोपण झाले आहे. ॐकार बीज प्रथमच निर्माण केले आहे. हेच सद्गुरु सर्वांठायी विखुरले आहेत. आज त्याचीच …

जे नामाने होते ते तपश्चर्येने होत नाही ©️

जे नामाने होते ते तपश्चर्येने होत नाही ©️

गंगा : मी सर्वस्व निरूपण देते. मी अन पार्वती दोघी बहिणी. तरी सता, पार्वतीने तपश्चर्या केली. अघोरांचे नामस्मरण केले. सता आपण निवेदन घेत आहात अन मी पूर्णत्व निवेदन देत आहे. स्वयंभू बरोबर कर्तव्य करणे माझे कर्तव्य! पण सता पार्वतीने अघोर तपश्चर्या केली. स्थितीप्रमाणे मी मोठी अन ती लहान होती. लहानांचे मनोगत पूर्ण करणे हे मोठ्यांचे कर्तव्य आहे. तिची पूर्णत्व इच्छा होती स्वयंभू तिचे पती व्हावेत. मी स्वयंभूना प्रणव दिले असते, तर मान्य केले नसते. महान हट्टी ज्योत आहे. म्हणूनच त्या अवधित मी प्रणव दिले आपण तिची इच्छा पूर्ण करणे. ज्यावेळी स्वयंभूंना आठवण येईल त्यावेळी मी तिथे येईन.

विष प्राशनानंतर जी स्थिती झाली त्यावेळी मी तेथे गेलेच ना! कर्तव्य केले अन आपल्या स्थानात आले. ती पार्वतीच्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी म्हणून! जे नामाने होते ते तपश्चर्येने होत नाही. सता पार्वतीस मी काही प्रणव दिले होते. पार्वती तू जे कर्तव्य करतेस ते योग्य नाही. या भूतलावर अनेक अवतार कार्य झाली. प्रत्येक अवताराचा आपण मनोमन कस घेतला. सता मजला कल्पना आहे जे संयमाने मिळते ते हट्टाने केव्हाही मिळत नाही.©️

You cannot copy content of this page