Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जडत्वाला जडत्वाची आवश्यकता असते – ©️

जडत्वाला जडत्वाची आवश्यकता असते – ©️

मालिक – प्रवचन भक्तीचे अंग फार न्यारे आहे. मी फार दूर नाही. आत्ताची प्रवचने जडत्वावर चाललेली आहेत. जडत्वाला जडत्वाची आवश्यकता असते, पण त्याच्या योगाप्रमाणे, त्याच्या संचिताप्रमाणे मिळणार. त्याचात तीळ मात्र शंका नाही. जर तो हात टेकू लागला तर घडेल किंवा नाही हे सांगता येणार नाही. याच्यात काही चूक नाही.

मानवता पूर्ण समजली म्हणजे कशाची आवश्यकता? सख्या भावाभावात एक विचार नाही. गुरुबंधूंचे नाते, कोणाचा कोणावर विश्वास नाही. किती जडत्वाची आवश्यकता असते. नाते, हे एवढे मोठे जग, याची गती घेतली तर मला वाटत नाही एवढे कलह होतील. मानवता जरी सेवेकर्‍यांना कळली, तरी वळत नाही आणि मग मी आणि तू वाढते. मग म्हणतात, “हेच तुला तुझ्या सद्गुरूंनी शिकवले आहे काय?”

आपणाला मानवता धारण करण्याचे संदेश आहेत. (एका सेवेकऱ्याची सूचना – तडाखे द्या) त्यावर मालिक म्हणतात, “तडाखे देणे ही यथायोग्य स्थिती नाही. त्यांना स्वतःच्या स्वयम् बुद्धीने समजले पाहिजे. परंतु मारून झोडून वळण लावणे हे यथायोग्य नाही.” सेवेकरी वाहू लागला, मग काय करायचे? त्याची मला पूर्ण गती आहे, पण होता होईल तेवढे सहन करणे. आपण काळजी करावयाची नाही.

परंतु सेवेकऱ्याने विचार केला पाहिजे की, माझे कुठे चुकते आहे? काही जडत्वाला संपत्ती अतीयुक्त दिलेली आहे, पण त्याला तरी शांती, समाधान आहे काय? कोट्यावधी मानव महान श्रीमान आहेत, पण त्यांना सुद्धा समाधान आहे काय? सेवेकऱ्याने जे आहे, कितपत पाहिजे आहे, त्याची आपल्या सुखात खुणगाठ बांधून ठेवली पाहिजे. ©️

You cannot copy content of this page