Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जगाच्या उत्पत्ती पासून ॐ या बिजाचे बिजारोपण झाले आहे. ॐकार बीज प्रथमच निर्माण केले आहे. हेच सद्गुरु सर्वांठायी विखुरले आहेत. आज त्याचीच …

जगत् जननी ©️

जगत् जननी ©️

दसरा: मी जरी जगतजननी असले, तरी हे निर्माण करणारा दुसरा कोणीतरी आहे. जगताचा व्यापार करण्याची शक्ती मला दिलेली आहे. कर्ता करविता फार निराळा आहे याची जाणीव मला होते, पण सत्तेचा अहंभाव निर्माण झाला की विसर पडतो.

सताची ओळख जाणीव होते. तेच कर्तव्य करून घेतात. रथाचे घोडे तेजदार असले, तरी सारथ्याचे कौशल्य असावे लागते, त्याप्रमाणे जगत हा रथ आहे, अन हे तत्व हे घोडे आहेत. त्यांना जर सारथी कौशल्यपूर्ण असेल, तर आमच्या कर्तव्याला तेज येते. असे असूनही अहंभाव निर्माण झाला की विसर पडतो, पण गती देणारा निराळा आहे, त्यांचा शोध घेण्याचे फार कष्टाचे होत असते याची जाणीव आहे. म्हणून या शुभ दिनी एक क्षण का होईना दर्शन घेऊन जात असते. आपले साह्य असेल तर, कर्तव्य तेजदार होते.

अघटीत तत्व फार वेगळे आहे. आम्ही कितीही वल्गना केली तरी, गती देणारे निराळे आहेत. फक्त जोपासना करणे आमचे कर्तव्य आहे. तरीपण प्रत्यक्ष मालकांच्या मनात आले तर क्षणात काय करतील हे सांगता येत नाही. कर्ते करविते ते आहेत. आमच्याकडून ते कर्तव्य करवून घेतात. आम्ही ज्या शक्ती आहोत, आम्हाला बाहेर कर्तव्य करावे लागते. कार्य करीत असलो तरी, आपल्या आदेशाशिवाय काहीच करु शकत नाही.©️

You cannot copy content of this page