बाबा – तुम्हीच मला सांगितले की काशीमध्ये हाक मारुन मला अनुग्रह दिला. १२ वर्षे माहूर गडावर पाठविले. हे किती भाग्याचे लक्षण आहे.
गोपाळकृष्ण – मी चुकीला पात्र आहे. मला ते टिकविता आले नाही. उच्च वर्णाच्या अभिमानामुळे मी घसरलो.
बाबा – कसले उंच?
गोपाळकृष्ण – प्रकृती अंगाने नटलेले जडत्व भिन्न असल्यामुळे उच्च वर्ण दाखवायचे. सत् तत्व हे दाखवित नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती भिन्न असतात. हि पायरी दूरावल्यामुळे आम्ही फसलो गेलो. कोणीही उच्च आणि कोणीही नीच नाही. सर्व एकाच समर्थांची लेकरे आहेत, पण जो जाणेल त्याला ! सध्याच्या काळात तीच परिस्थिती आहे. या ठिकाणी अखंड चमत्कार होऊ लागले तर बसायला जागा मिळणार नाही.
बाबा – कृपया या ठिकाणी चमत्काराची दिशा दाखवू नका.
गोपाळकृष्ण – हे चमत्कार मानवांना पहावयास मिळाले की त्या ठिकाणी काहीतरी आहे असे मानवाला वाटते. पण हे कशामुळे होते हे कोणीही शोधीत नाही. भक्तीला संदेश दिले तर कोणीही भक्तीला तत्पर होणार नाहीत. सत भक्तीचे लोण सर्वांना मिळेल हे बाकी सांगता येणार नाही. भक्तीचे मार्ग दोन आहेत. एक सत आणि दुसरा अघोर. अघोरी भक्तीने जाणाऱ्या ज्योती जास्त असतात.
बाबा – अघोर कोणाला म्हणावयाचे?
गोपाळकृष्ण – अघोर मार्ग म्हणजे ऋद्धी, सिद्धी, चमत्कार, नमस्कार यांनी नटलेला मार्ग आणि ऋद्धी सिद्धी मुळे होणारे चमत्कार याला अघोर मार्ग म्हटले आहे. ©️
