Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

गोपाळ कृष्ण – घोडबंदरचे बाबा ©️

गोपाळ कृष्ण – घोडबंदरचे बाबा ©️

गोपाळ कृष्ण आणि सद्गुरु माऊली (आपले बाबा) यांच्यातील संवाद (साधारण सत्तर ऐंशीच्या दशकातील हा काळ आहे – म्हणजेच सन १९७० ते १९८०)

गोपाळ कृष्ण- ते मला सारे पूर्णत्वाने कळून चुकले आहे. मोठमोठे श्रीमंत हे भगवंताचे भुकेलेले नसतात. ते फक्त मायेचे भुकेलेले असतात. त्याना भगवंत म्हणजे काहीही कळणार नाही. साधीसुधी म्हण आहे, “हात ओला, तर मैतर भला” ज्यावेळी चमत्काराने साध्य होत होते, त्यावेळी जाणे येणे होत होते. त्यांची पात्रता आहे का मला पाहण्याची?

बाबा – तुम्ही ज्योतिष चांगले सांगत होता.

गोपाळकृष्ण – या ज्योतिषामुळेच घसरलो मी.

बाबा – तुम्ही असे प्रणव काढले होते की मी कऱ्हाडी ब्राह्मण आहे.

गोपाळकृष्ण – बोललो होतो, कारण चमत्कार असल्यानंतर अहंकार निर्माण होतो अन् सत् भक्ती पासून दूरावला जातो. सत् भक्ती हि अहंकार, क्रोधरहित आहे. सत् भक्ती लिनता, नम्रता आणि शांती हा त्रिवेणी संगम हवाच हवा, तरच सत् भक्ती हि हृदयात रममाण होते. मी कोणी विशेष आहे असे म्हटल्यानंतर ती सत् भक्तीला बाजूला सारून मजा पाहत असते.

बाबा – मी, बाबाच म्हणणार तुम्हाला. तुम्ही मला प्रेमाने बच्चाच म्हणायचे.

गोपाळकृष्ण – काही म्हणा. डोळस असताना सुद्धा आंधळा झालो अन् म्हणूनच मी आपणाला ओळखले होते. वाटले होते कि आपण माझ्या सानिध्यात रहाल. नाही राहिलात ते फार उत्तम झाले. आपण प्रकाशित होता.

बाबा – कोण म्हणतो?

गोपाळकृष्ण – मी म्हणतो. आपली बुध्दी, आपले विचार श्रेष्ठ व उच्च असल्यामुळे मला आग्रह करता आला नाही. मी बच्चा म्हणालो, त्याची मला क्षमा करा. या जगात कोणीही श्रेष्ठ नाही. प्रकृती भिन्न आहे. सत् तत्व भिन्न नाही. ज्योत सर्व ठिकाणी समान आहे. ©️

You cannot copy content of this page