Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जगाच्या उत्पत्ती पासून ॐ या बिजाचे बिजारोपण झाले आहे. ॐकार बीज प्रथमच निर्माण केले आहे. हेच सद्गुरु सर्वांठायी विखुरले आहेत. आज त्याचीच …

गुरु बंधूत्वाचे नाते कसे असावे? ©️

गुरु बंधूत्वाचे नाते कसे असावे? ©️

श्री समर्थ मालिक – सद्गुरू ज्ञान देतात. ज्ञान सर्वांना दिलेले आहे, बहाल केलेले आहे. ते जतन करून, त्याची जपणूक करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. परंतु ते सांभाळता येत नाही, त्या ज्ञानाची बूज राखली जात नाही. तरी सेवेकऱ्यांनी स्वतःच्या मनाचे शोधन केले पाहिजे.

मी सेवेकरी कोणाचा? मी कोण व माझे कर्तव्य काय? मायेच्या रहित कोणीही नाही, तरी सुद्धा सेवेकऱ्यांनी मोह मायेच्या अधीन जाता कामा नये. आपल्या सद्गुरुंचे आदेश, संदेश पाळून त्या दिशेने सेवेकरी राहिल, तर सत् त्याच्यापासून दूर राहणार नाही.

“सेवेकऱ्याने माझे कर्तव्य काय? अन् मी कोणाचा सेवेकरी? मी करतो काय अन् मी काय केले पाहिजे? याचा पूर्णत्वाने विचार केला पाहिजे. भंडार भरलेला आहे, पण लुटणारा पाहिजे.” तसेच “प्रेम सूत्र दोरी अशी बांधिली पाहिजे की एकाच जीवात, एकाच रज्जूत आपणांस डुंबून जाता आले पाहिजे. हेवेदावे, मनाचा कलुषितपणा, कुणाही गुरु बंधू भगिनींना नाराज न करणे हे आपण अंगिकारले पाहिजे. अशीच मनाची ठेवण प्रत्येक सेवेकऱ्याने ठेवली पाहिजे.”

येथून पुढे कुणीही कोणाची मनें दुखवू नका. एकमेकांशी वागताना, एकमेकांशी बोलताना आपण कसे वागतो, आपण कसे बोलतो ह्याचे भान ठेवूनच आपली वाटचाल ठेवावी. आश्रमात किंवा दरबारात असताना स्थानाचे भान राखूनच आपली कृती ठेवावी.

गुरु बंधूत्वाचे नाते फार श्रेष्ठ आहे याचे सगळ्यांनी भान ठेवावयास हवे आणि त्या प्रमाणे वागावयास हवे.©️

You cannot copy content of this page