Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

गटबाजी करू नका…©️

गटबाजी करू नका…©️

सर्व सेवेकरी पूर्व संचिताप्रमाणे या आसना सानिध्यात घेतले आहेत. मग हेवे दावे कशासाठी? याचा विचार तुम्ही करा. यानंतर मात्र हेवेदावे नकोत.

आसनाधीस्त हे तत्त्व साधे सुधे नाही. ते कोणाकडूनही काहीही करून घेतील. ते कोणाला कळेल का? मग सेवेकऱ्यांचे मन गढूळ का? मनात शंका का? अन् कशासाठी? त्यांनी जे बीज पेरले ते एकच पेरले आहे, मग मनात शंका का?

रामदास स्वामींचा लाडका शिष्य उद्धवाला असेच वाटत होते. मी आदेशाप्रमाणे वागतो आहे. हे समर्थ रामदासांना कळले. तेथे रामदासांची आणि रंगनाथांची भेट झाली. त्यांनी त्यांना सांगितले, मी गडावर जाऊन येतो, तोपर्यंत तू येथेच राहा. गडावरून यावयास त्यांना वेळ लागला. परंतु रंगनाथ एकाच ठिकाणी उभा राहिला. तेथून लटकर आलेत त्यांनी विचारले, “महाराज तुम्ही उन्हात उभे का?” त्यांनी सांगितले, “समर्थ आदेश आहेत, त्याप्रमाणे मी येथेच उभा राहणार.” मग त्यांनी रंगनाथांवर छत्र धरले.

या ठिकाणी समानता आहे ना? मग मनात शंका का? लाघव झाल्यावर कोकाटता का? क्षमा मागायची काय जरुरी? मग हा दोष कोणाचा? मनाची भावना शुद्ध ठेवली तर तीर्थाची खाण कोठे आहे, झरा कोठे आहे, कोठे स्नान करावयाचे, मनाचे मुंडन होईल त्यावेळेला तीर्थाची खाण कोठे आहे हे कळेल. पण बुद्धी, कृती सत् ठेवाल तेव्हा !

मन अशुद्ध असले अन् तीर्थाची खाण जरी जवळ असली, तरी ती प्राप्त होणे कठीण आहे. जी घडण घडली, ती भिंतीला कान असल्यामुळे. सताला त्रास होतो. तो त्रास सहन करण्याकरता पुष्कळसे व्याप करावे लागतात. म्हणून मनाची शुद्धता करा. वर्तणुक सत् शुद्ध ठेवा, नाही पेक्षा तुमच्यासारखे अभागी कोण हे तुम्ही शोधा. या दरबारात जी घडण घडते, ती दुसरीकडे कोठे घडते का? याची सुद्धा पाहणी करा. सेवेकर्‍यांनी शुद्ध होण्याचा प्रयत्न करा. गटबाजी करू नका हे संदेश आहेत. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page