Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

काहितरी घडणारच आहे… ©️

काहितरी घडणारच आहे… ©️

कलियुगाचा मध्य उलटला आहे. काहितरी घडणारच आहे. गती घेण्याचा काळ अगदी समीप आला आहे. ज्या वेळेला कर्तव्य परायणता होईल, त्यावेळेला पूर्णत्वाने संदेश मिळतील. दिले जातील. चिंता करावयाची नाही. सत्य म्हटले तर हे कलियुग आहे. सत आहे. ते सत् तरी कशावरून?

कोकणात पडलेले आसन हे चमत्काराने नटलेले आसन आहे हे सत्य समजा. दंडकारण्यात सर्वत्र अघोरी तत्वे विखुरली होती. एक, दोन, तीन शुद्धीकरणे घेतली तरी ती भूमी अजून शुद्ध झालेली नाही. अशीच शुद्ध होत होत ती पूर्णत्वाने शुद्ध होईल. ती शुद्ध आणि पवित्र आहे. चमत्कार त्या ठिकाणी होतील. परंतु थोडासा अवधी आहे.

चमत्कार करावयाचे आहेत, ते याची देही याची डोळा पहावयास मिळतील. आजची गती जरी नाराजीची वाटली तरी नाराज व्हायचे नाही. सताला नेहमीच त्रास होतो, त्यावेळेला नाराजी होते. कर्तव्य करताना जो आनंद तो फार निराळा असतो. कर्तव्य केल्यानंतर जी ठेवण मिळते ती अखंड असते.

सातारला पण मानवी गतीप्रमाणे त्रास झाला. पण आसन त्याच ठिकाणी आहे. मानव जरी सत् तत्त्वाचा अंश असला तरी कालचक्रात जर सापडला तर तो सतापासून वेगळा राहतो. मग पळून जातो कोण? त्रास होतो हे मला मान्य आहे. त्या ठिकाणी मानवी गतीप्रमाणे भक्तीयुक्त वातावरण निर्माण झाले पण केव्हा? सत् हे अखंड पाठीशी आहेत हे समजल्यानंतरच ना? पण त्रास देणाऱ्याची कोणती गती झाली? पळून गेला कोण? आता त्या ठिकाणी मानाने, डौलाने त्या आसनाजवळ मिरवता आहेत ना? (समाप्त) ©️

You cannot copy content of this page