Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

उघडीले मन सद्गुरुंनी !

उघडीले मन सद्गुरुंनी !

श्री समर्थ मालिक – मनमिळाऊपणा – भाग एक

मनमिळावू म्हणजे काय? मन हे केवढे आहे? किती मोठे, किती बारीक आहे? पकडले तर सापडते कां? मन कोठून व कोणापासून आहे? मन म्हणजे काय? ते दिसते काय?

मन म्हणजेच माया ! माया दिसते कां? दिसे ते मायावी कसे? तत्व जे असे ते अविनाशी ! माया हि दिसते कां? तसेच मन हे दिसत नाही. आता, मन म्हणजे काय? तर हे येणारे मायावीचे तरंग ! हे दिसत नाहीत. मन हे सूक्ष्मापेक्षाही सूक्ष्म असून, ते अति वेगवान आहे. ते कवटाळता येत नाही.

मन हे कोणापासून? तर मजपासोनी असे म्हटले आहे नाही कां? मज काय आहे, काय नाही? येथील आसनाचे सेवेकरी आहेत, ते मनमिळावूपणाने अभिन्नत्वाने चालले आहेत कां? तर हे जे आहे, ते जडत्वाच्या चोचल्यांमुळे आहे. ही प्रकृती अनेक रुपाने नटलेली आहे. प्रकृती अंगाने सेवेकरी पाहतात, म्हणून मनाचे तरंग विखुरतात. प्रकृती अंगाने पाहिले नाही तर ते मन अनंत तऱ्हेने धावेल का? तर हे एकाच गतीने, एकाच ठिकाणी कसे गुंतवता येईल, तर आपणाला महान तत्व बहाल केलेले आहे. त्यात सेवेकरी रममाण झाल्यानंतर त्याला दुमत भासेल कां? तर नाही. अशा तऱ्हेने सेवेकऱ्यांनी चालले पाहिजे. ©️

You cannot copy content of this page