Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

आला कोठून? जायचे कोठे? ©️

आला कोठून? जायचे कोठे? ©️

श्री समर्थ मालिक – प्रकृतीच्या रहित मी आहे का? पण मीच सर्व करतो असे म्हणता येईल का? हि जी मेख आहे, तो कोण हे ओळखा. तो जर या जातीतील असेल, षड्विकार रहित असेल तर त्याला सर्वस्व बहाल केले जाते. ज्याने ही खूण ओळखली त्याला वेद कोठून सुटतात, प्रणव कोठून निघतात, आनंदी वातावरणात कोण होता, सहस्त्र दलांच्या प्रकाशाच्या अनुसंधनाने तल्लीन होत सद्गुरु कृपेने त्याला ऐकावयास मिळते. त्याला शुद्धी असते का? मग बोलतो कोण? प्रकृती सद्गुरूंच्या ठिकाणी लय केली मग राहील काय? ज्याचा तोच आनंद घेतो. ज्याचा तोच देतो. ज्योतीत ज्योत मिलन झाल्यानंतर बाकी काय उरते? प्रकृतीचा पूर्ण विसर पडल्यानंतर बोलणे चालणे कोणाशी होते? त्यातून उतरल्यानंतर प्रकृती शुद्धीत येते, पण सर्वस्व पूर्णात् पूर्ण विलिन झाल्यानंतर प्रकृती बोलते का?

म्हणून, “देव पहावयासी गेलो | देव होऊनची ठेलो ||” मग आनंदी वातावरणात होता कोण? आनंद देतो कोण? जडत्व जे आहे, ती माया आहे. चेतना दिली आहे. त्यायोगाने आकाराशी शरण जाऊन महान तत्व कोठे आहे हे समजेल. महान तत्वाचा अंत नाही. सापडले आहे का? प्रत्येकाच्या जवळ आहे. त्यात तल्लीन झाला तर सांगता येत नाही. मग जे अलिप्त आहे, ते कसे कळणार? मग कर्ता करविता कोण? यात मानवाने काय घ्यावयाचे? अन् म्हणूनच बोल अमर आहे. नाद अमर आहे. कोठून निघतो अन् जातो कोठे?

इतके सांगा की, अखंडापासून सर्वस्व होते, ते आकारी आहे, निराकारी पण आहे. स्थूल सोडले तरी सूक्ष्म, कारण, महाकारणापर्यंत जरी गेला तरी ते आकारी असते. अनु रेणू परमाणु पर्यंत जाण्याची पात्रता आहे की नाही ते मी सांगू शकत नाही. जरी याच्या पलीकडे गेला पण अहंकारी बनला तर नाश करण्यात येतो. म्हणून प्रकृतीला मंत्र तंत्र मिळाले म्हणजे ती प्रकृती अहंकारी बनते. प्रकृती जर तत्त्वासमान बनली तर त्यात तल्लीन होते. तशी प्रकृती नसेल तर त्याला काही कळणार नाही. प्रकृती अशा तऱ्हेची होईल त्यावेळी त्याचा तोच ऐकतो. त्याचा तोच बोलतो. प्रकृती धारण करणारी एक महान शक्ती आहे. आपण सेवेकरी आहात. आला कोठून? जायचे कोठे? याचा शोध घेणे हेच संदेश आहेत. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page