गुरुदेव पितामह : साधू कोणाला म्हणतात? या दोन अक्षरात किती महान अर्थ आहे, पण या कलियुगी स्थितीत मानव स्थितीप्रमाणे म्हणजे मंत्र, तंत्र सर्वस्वांत बहरलेला म्हणजे तो साधू! पण साधू आणि मुनी यात किती फरक आहे.
साधू कलियुगी स्थितीप्रमाणे मला साध्य कसे होईल हे पाहणारा? या मानवतेत अति अति म्हणजे मोहमायेच्या पाठी धावणारा ! यांना साधू म्हणावे का? तर हे साधू नाहीत. सता ! सत दृष्टीने पाहिले तर ते साधू नाहीत. अघोरी विद्या संपादन केलेले, अघोरातील अंती अघोर मानव आहेत.
या कलियुगी स्थितीत मानवते प्रमाणे मानवता आहे का? तर नाही. म्हणूनच यांना कोणते प्रणव द्यावेत? साधू द्यावेत का संधी साधु?
हेच मानव म्हणजेच स्थितीतील मानव कोणता दृष्टिकोन करीत आहेत. विमानातून पुष्पवृष्टी केली. पण कोणत्या विमानातून? यंत्र युगातील विमान! आमच्या युगात सत कर्तव्य झाल्यानंतर भूतलावर वरून पुष्पवृष्टी होत होती. ते कोण करीत होते तर देव करीत होते.
येथे सत कोण? मानव कोणते? देव कोणते? प्रथम प्रणव दिले कलियुगी स्थिती! त्यात कोणते दृश्य कसे दिसेल हे सांगता येत नाही.
नाशिकमध्ये प्रवेश करण्याचे वेळी एका घाटावर अगोदर गंगास्नानास जाणार. त्यावेळी जे काय करायचे ते पूर्णत्व करून याला कुंभमेळा म्हणतात. पण कुंभमेळा म्हणजे काय? आद्य युगात अशी स्थिती झाली. एक वेळेस आम्ही जे काही सत कर्तव्य करीत होतो त्याची जाणीव कोणाला झाली? तर सर्वस्वाचे पालन पोषण करणारे विष्णू यांनी त्यावेळी एका कुंभातून या गंगेत अमृत ओतले. त्यात स्नान केल्यानंतर कोणती गती प्राप्त होईल हे माहित आहे आपणास. अमृत कोणासाठी दिले तर आम्हासाठी, एक कुंभ भरून त्या गंगेत अमृत दिले, त्यात स्नान आम्ही केले. त्याला किती युगे झाली? तेच अमृत त्या स्थानात भरून राहिले आहे का? जर अमृत स्थिती असती तर अशी दशा झाली असती का? ©️
