Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

अनुग्रह…©️

अनुग्रह…©️

श्री समर्थ मालिक – अनुग्रह मिळण्यासाठी प्रथम भक्तीचे वळण लागते. पूर्व संचिताप्रमाणे त्याचे म्हणजे भक्ताचे कर्मसंचित दूर सारून सानिध्यात घेतले जाते. मग त्याची ती ठाम कृती कितपत आहे हे पहावयाचे असते.

ज्या ज्योतीला अनुग्रह पाहिजे आहे, त्या ज्योतीने सत गतीत राहिले पाहिजे. सेवेकर्‍यांना तसेच महान महान तत्वांना, ऋषीमुनींना सुद्धा अनुग्रहाची गती आहे.

आदेश सुटल्यानंतर अनुग्रह, अनुग्रह दिल्यानंतर ॐ काराचे बीजारोपण याचे प्रथम निवेदन दिले जाते अन् नंतर तो सेवेकरी बनतो त्याच सेवेकऱ्याची पुढे सद्गुरु बनण्याची तयारी असते.

अखंड तत्व म्हणजे सद्गुरु – जे आसनावर आरुढ आहेत ते ! एकमेकांच्या हाताला धरून जावयाचे, गती घ्यावयाची कि मी कसा आहे? त्याचे वर्णन नको. सद्गुरु म्हणजे काय?

मानवांना मानवाप्रमाणे सांगावयास पाहिजे. कारण काही जुने अनुग्रहित सेवेकरी आहेत. प्रथम अणूचे वळण लागावयास पाहिजे. नंतर अणूच्याही पलीकडे जावयाचे आहे. पण धीर धरा. आपण सर्वस्व एकच आहोत असे सेवेकरी का म्हणत नाहीत? मला अनुग्रह झाला म्हणजे सेवेकरी हुरळतो. आनंदीत होतो. तर जे हुरळत नाही, आनंदीत होत नाहीत असे ते तत्व आहे. सर्व ठिकाणी भरूनही उरले आहे. ज्यांना अनुग्रह झाला, त्यांना माहित आहे. बाकीच्यांना कर्मसंचिता प्रमाणे मिळणार आहे. (समाप्त)

You cannot copy content of this page