सद्गुरु बाबा : आम्ही एक बिंदू! आपल्या चरणावर स्थिर होण्यालायक आहे का?
नर्मदा निवासी : मान्य आहे. आता जे सत सानिध्यात मानव आहेत त्यांनी समजून घ्यावे. दोनच प्रणव ! सेवेकरी अन सद्गुरू!!
मालिक : ज्यावेळी अघोरांनी कुरघोडी केली त्याच वेळेला लक्षात आले की कोणाकडून कर्तव्य करावयास हवे? अखंड महाराष्ट्र शोधला. मग आपण कुठे भेटला? हा रहदारीचा रस्ता होता. त्या रस्त्यावर अनुग्रह दिला.
सद्गुरु बाबा : याच्या पूर्वीच्या काळी अनुग्रहाची पद्धत निराळी होती. पण आताचा अनुग्रह असा का? कोणाला समजू नये म्हणून केले असावे. ते आम्ही सर्व आपल्या कृपेने केले. गुरुदेव पितामह, गुरुकुले, अन आम्हाला पुष्कळ त्रास झाला. त्याची आपणास कल्पना आहे. शेवटी सताने आम्हाला यशस्वी केले. आता सांगणे एवढेच की स्थूल सोडून अधिकार बहाल केलेले प्रणव आपलेच का?
नर्मदा निवासी : हे आसन सताचे आहे. त्याला अधिकार कोण देणार? हे प्रणव शांडव अघोराने दिलेले होते. मी असे प्रणव दिलेले नाहीत.©️
