Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

श्री समर्थ मालिक प्रवचन ©️

श्री समर्थ मालिक प्रवचन ©️

दैविक शक्ती पेक्षा मनाची शक्ती फार मोठी आहे. कर्तव्य करीत रहा. फळ देणे घेणे स्वतःच्या आधीन नाही. केव्हां मिळेल याचा थांग लागणार नाही. उपाधी निर्माण होते. त्यावेळी नामाचा जो अमूल्य पेला आहे तो घेत रहा. निसर्गाला सुद्धा नियम आहे. प्रसंगाच्या वेळी मात्र मालिक आठवतात. इतर वेळी मालिक कोठे असतात? आताच या ठिकाणी सांगितले आहे, आपल्याकडे जो अमूल्य पेला आहे, तो घेऊ शकता. 

      ज्यावेळी सेवेकरी आडमार्गाने जातो, त्यावेळी लीला करावी लागते. सेवेकऱ्याला मारण्यासाठी नाही, तर सन्मार्गाला लावण्यासाठी होते. लीला केल्यानंतर तो सद्गुरु चरणांजवळ येत असतो. त्यावेळी त्याला आठवण होत असते. साध्या भोळ्या ज्योतीवर लीला होत नाही. मालिक तारक आहेत, मारक नाहीत. सर्वस्व चरणांवर समर्पित करा, म्हणजे काहीही यातना होणार नाहीत. सद्गुरु तत्वाची कोणीही ओळख करून घेतली नाही.

       भक्ती मार्ग सोपा आणि साधा आहे. या मार्गाने कोणालाही जाता येते. सतमार्गाने सत बीजारोपण होते. झाड लावण्यासाठी बीज एकच असते. एकानेच लावायचे. त्याची जोपासना करण्यासाठी अनेकांनी सहाय्य करायचे असते. मग ते भरभराटीला आल्यानंतर त्याची फळे अनेकांना चाखावयास मिळतात. 

       त्याचप्रमाणे नाम हेच बीजारोपण आहे आणि भक्ती हे झाड आहे. या भक्तीने त्याची जोपासना होते. आणि त्या ठिकाणी तन वाढले म्हणजे जोपासना न होता तेच भक्ती रुपी झाड कमकुवत होते. मनाची भावना ठाम पाहिजे. जे तन होतात ते काढून टाकावयास पाहिजेत. 

       सत् मार्गाने, सत् आचरणाने, सत् भक्ती युक्त अंत: करणाने ते तन काढून टाकावयास पाहिजे. मनाची शुद्धता झाल्यानंतर सत् मार्ग दिसतो. अशा तऱ्हेने जो जातो, तिच सहज समाधी होय. ©️

You cannot copy content of this page