Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

मालिक कोठे आहेत? ©️

मालिक कोठे आहेत? ©️

मालिक प्रत्येकाच्या हृदयरुपी पिंजऱ्यात दडून बसले आहेत. प्रत्येकाच्या हृदयात ते वास करुन आहेत.

मानव म्हणजेच ईश्वर! मग तो कोणत्या रितीने वागतो, कोणत्या रितीने कृती करतो, ती कृती सर्वस्व सत असली, तर सेवेकऱ्यांचाच फायदा आहे. पांच मिनिटे का होइना, सर्वस्व विसरून, एकाग्रतेने, तन्मयतेने मालकांच्या ध्यानात गुंगून जाणे, म्हणजे संचित आपोआप जाईल.

आपली मुले कितीही मोठी झाली तरी आई वडिलांना लहानच दिसतात. तद्वत आपले सेवेकरी कितीही मोठे असले, तरी मालकांना ते लहानच दिसणार! बालकच दिसणार, म्हणून सेवेकऱ्यानो सत मार्गी चला.

आपले गुरू कोण? ज्यांचा आपल्या शिरी हस्त पडला, तेच आपले गुरू होय. ज्यांना आपण पाहणार आहोत, तेच उपदेश करतात. त्यांना पाहण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत ते या हृदयरुपी पिंजऱ्यात आहेत, तोपर्यंत एकदा तरी डोळे भरून पाहण्याचा प्रयत्न करा. या हृदयरुपी पिंजऱ्यातून आत्मा निघून जातो. त्यावेळी नातेवाईक, कोणीही नसतात. जर आपण पुर्णांगी सत मार्गानें गेलो, तर त्यावेळीं फक्त आपले गुरूच त्याठिकाणी असतात. हा अविनाशी आत्मा, कुडीतून बाहेर पडल्यानंतर मालकांच्या बाजूला असतो, मग त्याची हालचाल, धडपड, बोलणे, चालणे सर्व काही बंद होते. अविनाशी आत्मा शांत असतो. शेवट शेवट आपले गुरु कसे आहेत, ते एकदा तरी पहा. तोच मोक्ष किंवा मुक्ति आहे. ज्याला आपल्या सद्गुरुंचे दर्शन मिळाले, तोच धन्य होय. त्यानेच मानवात सत् किर्ती केली असे म्हणता येईल. ©️

You cannot copy content of this page