Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

मानव जन्माची स्थित्यंतरे व शेवट –मालिक ©️

मानव जन्माची स्थित्यंतरे व शेवट –मालिक ©️

ज्योती जन्माला जेव्हा टाकतात, त्याचवेळेला त्याची सर्व व्यवस्था केली जाते. त्या ज्योतीला त्याची फिकीर नसते. मानव किंवा ती ज्योत वयात आली की, मायेत गुरफटते. त्या ज्योतीच्या कुटुंबात किंवा त्याच्या ठिकाणी कितीही ज्योती असल्या तरी ती मायेशिवाय राहत नाही. ज्योत जशी खेळकर होते, तस तसे ती मातेचे सुद्धा ऐकत नाही. खेळकर ज्योत आपल्या साथीदारांबरोबर बागडत असते.

त्यापुढे वयोमर्यादेत आल्यानंतर दोन हाताचे चार हात होतात. नंतर बाकीच्यांचा विचार करीत करीत सर्व कृतीकडे दुर्लक्ष होते, मग आपल्या साथीला असणाऱ्या ज्योती शिवाय बाकीच्या ज्योतींचे मानत नाही. ऐकत नाही.

असे वागत वागत गेल्यानंतर त्याला आकाश ठेंगणे वाटू लागते. ती ज्योत सैराट वागू लागते. मागचा पुढचा विचार मुळातच राहत नाही. असे झाल्यानंतर ज्योत वाहू लागते. अडीअडचणी निर्माण होतात. प्रसंगाला कोणी उभे राहत नाही. त्याला उपदेशाच्या गोष्टी कोणी सांगितल्या तर त्याचा परिणाम होऊ शकत नाही.

कशाची स्थित्यंतरे आहेत ही? मनुष्य ज्या वेळेला अडचणीत सापडतो त्यावेळी त्याला सोडविणारा कोणी भेटतो का? अशा प्रसंगात ज्योत सापडल्यानंतर अनेक अडचणी त्याच्या भोवती निर्माण होतात. शेवटी जीवनाला सुद्धा ती ज्योत कंटाळते. मानवांना ही जाणीव नाही. (पुढे सुरु….२)©️

You cannot copy content of this page