श्री कैलासपती स्वयंभू – जो शिव, त्याच्या ध्यानात सेवेकरी तल्लीन झाला म्हणजे मग रात्र काय आणि दिवस काय हे ध्यानात येत नाही. हिच ती शिवरात्र ! असे जे तत्व तेच सत्!
हे घडते कसे? तोच उपदेश अंबेला दिला कसा? ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. त्यातच विष नावाचे रत्न निर्माण झाले. चांगली चांगली रत्ने दुसऱ्यांनी घेतली, पण कोणीही विष घ्यावयास तयार होईनात. मग ते टाकावयाचे कुठे? ते विष नामक रत्न आम्ही प्राशन केले. ते घेतल्याबरोबर सर्व देहाची आग झाली. स्थिरता नाही, शांती नाही. कोण म्हणे, वासूकी सर्प गळ्यात बांधा, चंद्र मस्तकी धारण करा, गंगा बोलवा, तिला धारण करा. सांगितल्याप्रमाणे सर्व केले, पण शांती मिळाली नाही.
तदनंतर समर्थ माऊलीने येऊन सांगितले की अरे, हे तू (नाम) जप म्हणजे तुला शांती मिळेल अन् तेव्हापासून मी त्याच ध्यानात आहे.
आज उपदेश आदी मायेला सांगितला आहे. जे स्वयमेव तत्व त्याचीच ही शिवरात्र ! हरकत नाही, पण अज्ञानाला हे सापडत नाही, म्हणून मानव भटकत आहे. ©️
