Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

महाशिवरात्र – २ ©️

महाशिवरात्र – २ ©️

श्री कैलासपती स्वयंभू – जो शिव, त्याच्या ध्यानात सेवेकरी तल्लीन झाला म्हणजे मग रात्र काय आणि दिवस काय हे ध्यानात येत नाही. हिच ती शिवरात्र ! असे जे तत्व तेच सत्!

हे घडते कसे? तोच उपदेश अंबेला दिला कसा? ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. त्यातच विष नावाचे रत्न निर्माण झाले. चांगली चांगली रत्ने दुसऱ्यांनी घेतली, पण कोणीही विष घ्यावयास तयार होईनात. मग ते टाकावयाचे कुठे? ते विष नामक रत्न आम्ही प्राशन केले. ते घेतल्याबरोबर सर्व देहाची आग झाली. स्थिरता नाही, शांती नाही. कोण म्हणे, वासूकी सर्प गळ्यात बांधा, चंद्र मस्तकी धारण करा, गंगा बोलवा, तिला धारण करा. सांगितल्याप्रमाणे सर्व केले, पण शांती मिळाली नाही.

तदनंतर समर्थ माऊलीने येऊन सांगितले की अरे, हे तू (नाम) जप म्हणजे तुला शांती मिळेल अन् तेव्हापासून मी त्याच ध्यानात आहे.

आज उपदेश आदी मायेला सांगितला आहे. जे स्वयमेव तत्व त्याचीच ही शिवरात्र ! हरकत नाही, पण अज्ञानाला हे सापडत नाही, म्हणून मानव भटकत आहे. ©️

You cannot copy content of this page