Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

नामस्मरण करताना मन मायेत गुंतवू नका …..©️

नामस्मरण करताना मन मायेत गुंतवू नका …..©️

अलख – नामस्मरणात बसल्यानंतर, अखण्ड नाम चालू असताना मन मायावी जाळ्यात गुंतवले तर त्याला अर्थ नाही. असे नामस्मरण मालकांच्या चरणांवर रूजू होईल काय? तासन् तास बसण्यापेक्षा पाचच मिनिटे बसा. सर्वस्व विसरा. मालिक आणि मी, बाकी काही नाही. अशा तऱ्हेने बसलात तर होईल. तासन् तास बसून, दुनियेच्या वदघटित मन गुंतवणे, विचार करणे, त्या नामाचा उपयोग नाही. तसे न करता, असे करा, म्हणजे त्या पदाला जाल. ते का होत नाही? किती सांगितले?

साधत नसेल, तर विचार करा. कसे बोलावे, कसे चालावे, वागावे म्हणजे मी सत् पदाला जाईन? तसे न करता, सेवेकरी प्रवचन ऐकतात. दरबाराच्या बाहेर गेल्यावर सर्व विसरतात. जे अमोलीक बोल ऐकता, ते बोल अनाठायी घालवू नका. जाऊ देवू नका. विचार करा. तुमची तुम्हालाच उत्तरे मिळतील. ज्ञानाची भर पडेल. सेवेकऱ्यास पुष्कळ सांगतात, पण ते ऐकत नाहीत. सेवेकरी कृती करीत नसेल, तर मालिक काय करणार? सत कृती असेल, तर संचिताचा नाश होतो. असत कृतीने संचिताचे डोंगर वाढतात.

पूर्व योनीत सत् कृती म्हणून हा मार्ग मिळाला आहे. आता सत कृती केल्यास पुढे हक्काने मानव जन्म मिळेल. सेवेकरी ज्यावेळेस अनुग्रहित होतो, त्यावेळेला नाश कसा होईल? आपली कृती सत होईल, अशा तऱ्हेने कर्तव्य करीत गेले पाहिजे. सदगुरू अनुग्रह हे एक प्रकारचे वळण आहे. ज्यावेळेला मानवाला जन्माला घालतात, ते त्याच्या सत् कृतीमुळे! मोठे झाल्यानंतर ज्याप्रमाणे असत कृती, त्याप्रमाणे संचित जमा होते. पुढे जर सत् कृतीने जाल, तर सत् संचित जमा होईल. ©️

You cannot copy content of this page