श्री विठ्ठल – हजारो तत्वे भूतलावर आहेत. त्यांना अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे आम्ही कोणीतरी विशेष आहोत असे आम्हाला वाटले होते. गुरु हे तेच सद्गुरु, तेच गुरुपद नटवू शकते. तेच निराकार पण होऊ शकते.
सगुण घडवले कोणी? प्रकृती घडवली कोणी? तेच आकारी, तेच ओंकार स्वरूप म्हणून गुरु चरण हे श्रेष्ठ आहेत, पवित्र आहेत, शुद्ध स्फटिकासारखे आहेत. त्या ठिकाणी मी-तू, शुद्ध-अशुद्ध असे काही नाही अन त्याच ठिकाणी सेवेकऱ्यांच्या मनाची नम्रता, लिनता पाहिजे, मानवांची सोडून द्या.
अनेक मानवांच्या अंगी काय गुण आहेत? त्यांच्या ठिकाणी भिन्नता आहे, त्यामुळे त्यांना कळत नाही, म्हणजे गुरु चरण पाहता येत नाहीत, समजत नाही, अन जर समजले तर, जगात भिन्नता काही नाही. मग मी, तू निर्माण झाले नसते. प्रकृती ही भिन्न आहे म्हणून भांड आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत, म्हणून जो सतशुद्ध मार्गाने जाईल त्यालाच सद्गुरु चरण पाहता येतील, अंत घेता येईल. अन तेथूनच त्याला वाटचाल करता येईल. ©️
