श्री समर्थ मालिक – मानव धर्म श्रेष्ठ आहे. या ठिकाणी नाम सर्वस्व आहे. सहज साधारण नाम म्हणजे भक्ती ! नाम कोणत्या तऱ्हेने झाले यावर लक्ष देणे. नामासारखी गोडी नाही. नामाशिवाय मनुष्य जन्माची गोडी लागत नाही. आपले जीवन कोणत्या तऱ्हेने जात आहे, हे फक्त अखंड नामाने लक्षात येते आणि म्हणूनच मुख्य नाम निर्माण झाले.
नाम मनुष्य जीवन तारण्यासाठी आहे. नाम ही वस्तु नाही, आकार, रूप, रंग काही नाही. आपण जसे पाहू तसे दाखविले जाते. ज्या इच्छेने घेऊ, ती इच्छा पुरी करते.
नाम हे बीजारोपण आहे. शुद्ध भूमी सात्विक झाल्यानंतर त्याच ठिकाणी असणारे नाम हे बीज आहे.
नाम हे अनेक तऱ्हेचे, अनेक मार्गात घेतले जाते. ज्यात मनुष्याचा उद्धार होतो, ते नाम सहसा लवकर मिळत नाही. नामाची गोडी लागल्यानंतर, ते सुटत नाही. असे ते नाम कोणते? त्याची गती काय? ते नाम कोठे आहे? याची ओळख आपणाला सद्गुरु करून देतात. ज्या ठिकाणी ते प्रगट झाले, ते चराचर, परात्पर, क्षरात्क्षर असे सर्वस्व व्यापून देखील अलिप्त आहे. (पुढे सुरु…२) ©️