Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

दरबार महती…..(१) ©️

दरबार महती…..(१) ©️

हा दरबार दैवतांचा किंवा व्यक्तींचा दरबार नाही. अनंत काळापासून चालत आलेला हा दरबार आहे. या चार दरबारांची स्थापना अनंत काळाची आहे. त्या पैकीच हा एक दरबार आहे.

जो ज्या तऱ्हेने पाहतो त्याप्रमाणे त्याला त्याची ओळख होते. याची शोभा अनंत काळापासूनची आहे. आता कार्य करण्यासाठीं अवतार कार्य सुरू झालेले आहे. त्याचा थोडासा भाग होत आला आहे. आता खऱ्या अर्थाने कार्याला सुरुवात होणार आहे.

या दरबारच्या सेवेसाठी ऋषी, मुनी, दैवते तत्परतेने उभी आहेत. या दरबारच्या सेवेकऱ्यांचे भाग्य खरोखरच थोर आहे. पूर्व जन्मीच्या ठेव्याशिवाय हे लाभणार नाही.

अनेक ज्योती येणार आहेत. पूर्वीच्या आलेल्या ज्योती केव्हाही वाया जाणार नाहीत. असा हा दरबार आहे. याची महती ज्याला चाखता आली, असा हा अत्यंत श्रेष्ठ ठेवा प्रत्येकाने जतन करून ठेवला पाहिजे.

अनंत काळापासून चालत आलेल्या चार दरबारापैकी हा प्रथमचा दरबार होय. तेंव्हा या ठिकाणची प्रसन्नता पाहून, आरती घेवून जाण्याचा ठाम निश्चय झाला व तो पूर्ण सफल झाला. इतर तिन्ही दरबारात अशा तऱ्हेने विवरण होत नसते. म्हणूनच आरती घेवून जावयाचे होते. त्या तीन दरबारच्या सूक्ष्म ज्योती येथे आल्या होत्या. कोणी पाहिल्या का? कोणाला दिसल्या का? आदेश दिला होता. त्या ज्योती आल्या आहेत हे पाहण्याची मोकळीक दिली होती. ©️

You cannot copy content of this page