Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

त्रास सहन केला पाहिजे ©️

त्रास सहन केला पाहिजे ©️

सत मार्गाने जाणाऱ्या ज्योतीना त्रास का? सत्य आहे. हा वाजवी प्रश्न आहे. पण सत् मार्गाने जाणाऱ्या ज्योती किती आहेत? मानव हा स्थुल देही आहे, पण पूर्व संचिताचे काय? आदी अंतापासून किती संत होऊन गेलेत त्यांनी असे विचारले नाही.

मानवाच्या मनाची चंचलता, त्याचप्रमाणे शंकाकुल स्थिती, म्हणून म्हणतो हे कलियुग आहे ! पण भक्ती आदीअंतापासून एकच आहे, मग असे का? अवतार कार्य का नटवावे लागते? सत, असत मानव आहेत, का मी आहे? मी सतात पण आहे आणि असतात पण आहे. मी करून घेतले, तर कोणकोणते कर्तव्य करून घेतो? मी सगळेच करतो तर मानव दुःख का भोगतो?

सेवेकरी मनाच्या आधीन बनल्यानंतर, एकदा दोनदा गती दिली असताना सुद्धा मायेच्या आधीन गेल्यानंतर, मी त्याला मागे खेचत नाही. ब्रह्मा विष्णू महेश यांना सुद्धा भोगत्वातून सोडले नाही, मग मानव त्यांच्यापुढे काय आहे? म्हणून मानवांना हे सुटले नाही व सुटणारही नाही. सताला त्याचे शुभ अशुभ काही नाही. अघोर मानवांना ब्रह्मज्ञान किती जरी सांगितले, तरी ते पटणार नाही. सत् हे केसापेक्षाही लहान आहे, मग त्याला कोणी ओळखेल का? ज्याने ओळखले तो दैवतांची पूजा करेल का? अघोरांच्या पाठीमागे लागेल का? सताचा जरी वर पगडा जास्त झाला तर ते सुद्धा शांत रितीने राहू शकत नाही. जर सत् होते, तर महाराष्ट्राला शाप का दिला? मग याला तुम्ही तोड शोधून काढा. शेतात पीक चांगलं लावले, तर त्या पिकालाच किंवा त्या बाजूलाच पाणी पाजा, पण शेतात दुसरी वनस्पती उगवतेच नां? मग त्याना का पाणी पाजा? तसेच हे आहे. शेतात ऊस लावला तर उसाबरोबर दुसऱ्या वनस्पतीलाही पाणी मिळते, म्हणून सत् असत दोघांचे घर्षण झाल्याशिवाय अग्नी निर्माण होत नाही. तो अग्नी निर्माण झाल्यानंतर सत् तारले जाते. असताचा नाश होतो. मग त्या वेळेला सताला त्रास होतो की नाही? तो त्रास सताने सहन केला पाहिजे. ©️

You cannot copy content of this page