श्री समर्थ मालिक – अतिशय त्रास होऊ लागला तर त्या ठिकाणी तत्त्वाला सुद्धा सहन करावे लागते व थोडीशी माघार घ्यावी लागते. परंतु भक्तगणांना जर कां त्रास पडला, तर तो वैतागला जातो.
कर्तव्य करतो म्हणून संदेश दिलेले आहेत. कर्तव्य अस्त्राकडून करून घेवोत अथवा जातीने करून घेवोत हे विचारावयाचे नाही. कर्तव्य पाहण्यात, अनुभवण्यात आल्याशिवाय कर्तव्य चालू झाले आहे असे म्हणता येणार नाही. पाहू, कर्तव्याची दिशा किंवा कसे होते ते? घर्षण झालेले आहे. याबद्दल त्यांना टोचले आहे. तदनंतरच कर्तव्याची दिशा लवकर अंमलात आणतील असे वाटते. त्यांना ते कर्तव्य करणे भाग पडेल. त्यांचा रोख काय आहे?
७२-७३ त्या काळात जमीन अस्मानाचे अंतर आहे. काही लाटा येणार आहेत. त्या लाटेत काय होईल हे सांगता येणार नाही. या लाटा त्यांच्या संदेशाने सुटणार आहेत म्हणून सध्याची परिस्थिती फार बिकट आहे. या बिकट परिस्थितीत मानव फार चिरडले गेले आहेत, जाणार आहेत, तरी सर्वांनी आपल्या आद्य कर्तव्यात राहणे अर्थात नामस्मरणात राहणे हे संदेश आहेत. ©️
