Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

ज्ञानेश्वर माऊली…..प्रवचन ©️

ज्ञानेश्वर माऊली…..प्रवचन ©️

स्वाभिमान आणि अभिमान –

स्वाभिमान आणि अभिमान याचा अर्थ एकच आहे. भक्ती करताना स्वाभिमान आणि अभिमान याने पूर्णपणे रहित होऊन भक्ती मार्गास लागणे. त्यानंतरच पुढच्या पायरीची जाणीव होईल.

स्वाभिमान आणि अभिमान या जाळ्यात गुरफटल्या नंतर भक्ती ही काय चीज आहे, याची जाणीव होणे अशक्य आहे. भक्ती करताना या दोन्हीं स्थिती स्वाभिमान आणि अभिमान यांनी पूर्णपणे रहित होऊन नंतरच तिथपर्यंत पोहचू शकाल. या जाळ्यात गुरफटल्या नंतर ती ज्योत केव्हाही पुढें जाऊ शकत नाही. कितीही धडपड केली तरी पुढें जाळे येणारच ! भक्ती मार्गात जाताना, प्रथमच जाळे तोडून भक्ती मार्गस्थ होणे.

प्रत्येक संत जर स्वाभिमान आणि अभिमान धरून चालले असते तर तेथपर्यंत त्या पायरीला पोहचले नसते. जर आपल्या आयुष्याचे कोटकल्याण करुन घ्यायचे असेल तर त्याला प्रथमच या जाळ्यातून मुक्तता करून घ्यावी लागते. तोच तिथपर्यंत जाऊ शकतो.

भक्ती ही चीज सोपी, तितकीच कठीण आहे. जो शुद्ध भावना व शुद्ध आचरण याने जातो त्याला केव्हाही अडथळे येणार नाहीत. ज्या ज्योतीच्या मनामध्ये स्वाभिमान आणि अभिमान जागृत आहे, अशा ज्योतीना प्रत्येक ठिकाणी अडथळे येतात. अडथळयात गुंतल्यानंतर पुढच्या मार्गाला चुकतात. तेथून खालच्या पायरीला येऊन पोहचतात.

बाबा – आम्हा सेवेकऱ्याना दर्शन कसे लाभेल? कोणत्या मार्गाने जावे?

ज्ञानेश्वर – अभिमान स्वाभिमान, अहंकार याने रहित होऊन जो जाईल, तोच त्या पायरी पर्यंत पोहचू शकेल.

बाबा – अहंकार रहित कसे व्हावे?

ज्ञानेश्वर – त्याचा नाश करण्यासाठीं प्रथम गुरु केला पाहिजे. गुरु सुद्धा सत् आचरण, सत् मार्ग याने चालणारा पाहिजे. तरच तो मार्ग दाखवू शकेल. जो सत आहे तो आपल्या शिष्यांना सत् मार्ग दाखविल. जो असत आहे, तो असत मार्ग दाखविला. याचा नाश करण्यासाठी गुरू ही चीज काय आहे, याची ओळख घेतली पाहिजे. नंतर आपल्या स्वरूपासी लीन होऊन याची जाणीव घेतली पाहिजे. तोच तिथपर्यंत त्या पदाला पोहचू शकेल. तोच खरा धन्य होय ! ©️

(समाप्त)

You cannot copy content of this page