Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जर ईश्वर पाहिला… ©️

जर ईश्वर पाहिला… ©️

श्री विठ्ठल – सद्गुरूंची चलाखी ही तरी कोणत्या सेवेकर्‍याला कळली आहे का? साधे, सुलभ. कधीतरी लहरीत असल्यानंतर बोल फेकतात. ते मार्मिक बोल कसे आहेत हे सेवेकर्‍यांनी ओळखावे. सहज बोलणे यात मर्म आहे. हाच उपदेश आहे. आज सेवेकर्‍यांनी घेण्याचा प्रयत्न करावा. सद्गुरु कृपेने स्वतःची खूण स्वतःच ओळखली नाही, तर तो मानव आहे हे सिद्ध होत नाही. मानव आहे हे ज्याने ओळखले, त्यालाच सापडले. ज्याने ओळखले नाही, त्याला सत तरी कसा अंत देईल?

मोठ मोठी प्रवचने सांगतात. त्याने जर ईश्वर पाहिला, तरच तो सांगतो की जगात परमेश्वर आहे. खरे पाहिले तर, पूर्वीचे महामुनी, महायोगी यांनी कधीही कीर्तने सांगितली नाहीत. रामदास, तुकाराम, नामदेव आदींनी कीर्तने केली, ती मानव सुधारण्यासाठीच केली. भक्तीचे वळण दाखविण्यासाठी केली.

आता पंढरीला पुष्कळ भक्त येतात व मंदिरात पुष्कळ गर्दी होते. कोणी बडव्यांच्या सोटक्यामुळे जवळ सुद्धा येत नाहीत. मग तो भक्त असे म्हणावे का? बडव्यांना तरी कळले आहे का? पैशासाठी सारखी मारझोड चाललेली असते. जो भक्त आहे, त्याला काही सांगावे लागत नाही. तो जिथे बसेल, तेथेच तटस्थ राहील व विठ्ठल कोठे आहे हे पाहिल.

आम्हाला कोणीतरी अधिकार दिलेले आहेत. त्याप्रमाणेच आम्ही चालतो. ज्या ठिकाणी बसाल, त्या ठिकाणीच मला पाहू शकाल. मी कोणत्या रूपात आहे, हे कोणी पाहिले आहे का? मी कोणत्या रूपात त्या ठिकाणी आहे? खांद्यावर घोंगडी, हातात काठी घेऊन आलो. नंतर मी बाल स्वरूपात आहे, हे कोणी पाहिले आहे का? मानव हा चुकीला पात्र आहे. पण तो जर स्वतःला जखडून राहील तर त्याच्याकडून चुका होणार नाहीत. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page