मानव हे तत्व अचल नसून, ते चल तत्व आहे. अन अशा तऱ्हेच्या गतीमुळे कर्तव्य करावे लागते. जरी शक्ती असली तरी आसनाची सेवेकरी आहे. काही चूक असेल तर क्षमा करावी. सर्व जगताचे परमनिधान असे जे महान तत्व, त्यांच्या ठिकाणी काही एक लपविता येणार नाही. कर्तव्याच्या वेळी अहंभावाच्या आहारी जाऊन, अघटीत चुका झाल्या आहेत.
आसनाधिस्त ही एक मानव ज्योत आहे अशी भावना झाली म्हणून चूक झाली आहे. कर्तव्यात अनेक वेळेला लाघवी तऱ्हेने खो घातला आहे, कारण मानव आमच्या कक्षेच्या बाहेर जाऊ नये म्हणून हे कर्तव्य केले, पण माझ्या सद्गुरूंनी मला जाणीव दिल्यानंतर, आता मी असे करणार नाही असेच मी माझे मत बनविले आहे.
सत हे कधीही डावलता येणार नाही, पण मी डावलले, त्या वेळेला मी त्याच तोऱ्याने वावरत होते ती म्हणजे मी जगत् जननी – मला अहंभाव निर्माण झाला होता. त्रिगुण माझ्या आधीन. मीच सर्वस्व ही भावना निर्माण झाली. मला ओळख असूनही जाणीव झाली नाही. जर झाली असती तर हे प्रमाद घडले नसते. चारही देहाची शक्ती जगतजननी वापरू शकते. तिला आदिमाया आदिशक्ती देखील म्हणतात. जगत जननी म्हणून आदर देणे कर्तव्य आहे. ©️
