Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

कर्ता करविता……©️

कर्ता करविता……©️

आपण सर्वस्व दृश्य आहोत. जडत्व आहोत. दृश्य हे सर्व जग आहे. चर अचर सुद्धा दृश्य आहे. ज्याला हालचाल नाही ते निर्जीव आणि ज्याला हालचाल आहे, ते सजीव. हे सुद्धा दृश्य आहे. आपल्या गेल्या जन्मीचे जे प्रारब्ध त्याप्रमाणे या योनीत सत फळ मिळत असते आणि ते समर्थ देतात. समर्थ म्हणतात, “मी कोणाचाही ऋणी नाही. ज्याच्या त्याच्या संचिताप्रमाणे मी फळ देत असतो.” दृश्याला दृश्य फळाची आवश्यकता आहे.

वयाच्या १८ व्या वर्षी लग्न होते. मग हालचालीला सुरुवात होते. मग खोलीची जरूर भासते आणि त्याप्रमाणे धन मिळाले की, हालचालीला सुरुवात होते. याप्रमाणे दृश्याला दृश्याची आवश्यकता आहे. पण, प्रथम नि:ष्काम गती पाहिजे.

मी जरी काम करतो, काम करण्यासाठी मजूर लावतो, घरे बांधतो, दगड लावतो तरी हे माझे काही नाही. सर्वस्व भगवंताचे आहे. मी निमित्त मात्र आहे. इतकी जरी धारणा झाली, तरी गती नि:ष्काम होते. मग सर्वस्व आपोआप जाग्यावर येते. पण नि:ष्काम धारणा ठेवली पाहिजे. पण, याच्या उलट स्थिती झाली तर मन बेचैन होते. पण दृश्यातच राहून, दृश्याशी खेळ खेळत स्थिर व्हावयाचे आहे. सर्व ऋषीमुनी होऊन गेले. त्यांची धारणा नि:ष्काम होती. ते म्हणत, “कर्ते, करविते निराळे आहेत. आम्ही निमित्त मात्र आहोत. सर्वस्व त्यांच्याच कृपेने होते.”©️

You cannot copy content of this page