Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

अद्वैत भक्ति ©️

अद्वैत भक्ति ©️

अद्वैत भक्ती म्हणजे काय? व ती कशी करावी?

भक्ती करतो म्हणून ती होत नसते. करावयाची आहे म्हणूनही ती होत नाही. भक्ती करुन घेणारा व करणारा हा एकच असतो. तो शुद्ध स्फटिकासारखा भावना रहित असतो, कल्पना रहित, संशय रहित असतो. म्हणजे काहीच कल्पना नसते. यालाच म्हणतात अद्वैत भक्ती !

मात्र मानवांना अद्याप याची जाणीव नाही. भक्ती करतो, परंतु ती कोणाची करावयाची?

काहीजण भक्ती करतात, ती स्व:हितासाठी. काहीतरी साधण्यासाठी भक्ती करतात. मात्र साधनारहित, हितरहित, आशारहित, भक्ती करणारा क्वचितच असतो.

सद्गुरु भक्ती वा सदगुरू भक्तीची तऱ्हाच वेगळी आहे. या भक्तीला सत् असत, लटपट, खोटे नाटे, रिद्धी सिद्धी, तंत्र मंत्र, वनस्पती काहीही लागत नाही. फक्त येथे एकच आहे, सद्गुरु चरणात लीन आणि त्यांच्याच ध्यानात तादाम्य होऊन स्वतःच्या स्वरूपाची जाणीव करून घेणे, समर्थांच्या चरणात लीन होणे यालाच भक्ती म्हणतात.

ईश्वरी तत्त्व कोठे आहे नाही असे म्हणताच येत नाही आणि कोठे ठावही रिकामा नाही आणि असा कोणीही बोट लावू शकणार नाही. मुळापासून निष्काम भक्ती करीत राहिल, त्याला मात्र दर्शनास वेळ लागणार नाही. आशेच्या अनुरोधाने सकाम भक्ती जो करील, तो मात्र दुरवल्या खेरीज केव्हांही रहात नाही. इतकेही करून उलट तो म्हणतोच कि एव्हढे करून देखील मला दर्शन कसे मिळत नाही? विचार करा, अशाना दर्शन कसे बरे मिळेल? भक्ती करणारा, नामस्मरण करणारा तू कोण? कोणाच्या आधाराने भक्ती व नामस्मरण चालू आहे. याचा विचार मुळात करीतच नाही. ©️

You cannot copy content of this page