Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जगाच्या उत्पत्ती पासून ॐ या बिजाचे बिजारोपण झाले आहे. ॐकार बीज प्रथमच निर्माण केले आहे. हेच सद्गुरु सर्वांठायी विखुरले आहेत. आज त्याचीच …

Satara / सातारा

माऊली महाबळेश्वर येथे एका भक्ताच्या ठिकाणी भेटण्यास गेली होती, तेथे जाऊन आल्यावर मालकांनी (सर्वज्ञ) एकचित्तामध्ये संदेश दिले होते की सातारा येथे आपली, सताची अनेक गुरूकुलें आहेत व त्यांच्यासाठी तेथे आपल्या सद्गुरू आश्रमाची स्थापना करावयास हवी.

त्यातच सातारा येथील श्री विवेक मुनी यांनीही सताजवळ येणे आपल्या श्री सद्गुरू माऊलींकडे सातत्याने आग्रह धरला की येथे आम्हा गुरूकुलांसाठी सताचे स्थान असावे आणि या इच्छेखातर व मालकांच्या संदेशानुसार ११ मे १९६१ ला गांव: इंगळेवाडी, तालुका: सातारा, जिल्हा: सातारा येथे सातारा आसनाची स्थापना करण्यात आली.

आजूबाजूचा परिसर जसे कृष्णा-वेण्णा संगम, कराड येथील कृष्णा-कोयना संगम, अजिंक्यतारा गड, श्री रामदास स्वामींचा सज्जनगड, थंड हवेचे ठिकाण पांचगणी आणि महाबळेश्वर, औंध संस्थान इत्यादी इतिहास प्रसिध्द स्थानांनी वेढलेला हा परिसर म्हणजे ऋषीमुनींच्या वास्तव्यासाठी प्रसिध्द असलेला परिसर होय. त्यामुळे अशा या पावन पवित्र भूमीत सताचे आसनाची स्थापना म्हणजे दुग्ध-शर्करा योगच होय.

You cannot copy content of this page