Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जगाच्या उत्पत्ती पासून ॐ या बिजाचे बिजारोपण झाले आहे. ॐकार बीज प्रथमच निर्माण केले आहे. हेच सद्गुरु सर्वांठायी विखुरले आहेत. आज त्याचीच …

Malad / मुळाश्रम मालाड

कोकणातील वालावल क्षेत्री, चौधरी कुटुंबात ओंकारांच्या २६ व्या अवतार कार्याचा प्रारंभ झाला. वालावल क्षेत्री जन्म म्हणून ते स्थान जन्मस्थान झाले. पूर्वाश्रमीचा रामावतारातील पितामह वसिष्ठ गुरुदेवांचा हाच आश्रम, आताच्या ॐ कारांच्या २६ व्या अवतारातील वालावल किंवा कोकण आश्रम म्हणून ओळखला जातो.

मुंबई मालाड येथील मूळ आश्रम म्हणजेच माऊलींची घरकुल अर्थात संसार गृहस्थिती ! पूर्वाश्रमीचे हे वास्तव्य स्थान म्हणजे एक पर्णकुटीका होती. पुढे पुढे त्यात बदल होत जाऊन, आत्ताचे हे भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झाले व मुळाश्रम या नामाभिधानाने पावन झाले. येथेच माऊलीने आपले पुढील संपूर्ण आयुष्य “संसार करून परमार्थ साधा” या आपल्या भक्तांसाठी बोधप्रद ठरलेल्या उक्तीनुसार व्यतीत केले व मानवी अवतार कार्याची अवधीतच संपन्नता केली.

मुळ आश्रम म्हणजेच माऊलींची घरकुल अर्थात संसार गृह स्थिती !

कोकणातील वालावल क्षेत्री, चौधरी कुटुंबातील गृह स्थितीत ह्या ॐ कारांच्या सव्विसाव्या अवतार कार्याचा प्रारंभ झाला. पुर्वाश्रमीचे हे वास्तव्य स्थान म्हणजे एक पर्ण कुटिका होती. पुढे पुढे त्यात बदल होत जावून, आताचे हे भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झाले. “वालावल” क्षेत्री जन्म म्हणून ते स्थान “जन्मस्थान”. ह्यालाच वालावल किंवा कोंकण आश्रम म्हणून ओळखतात.

“मालाड” हे संपूर्ण अवतार कार्यातील गृहस्थिती स्थान असल्याने, ते मुळ स्थान “मुळाश्रम” या नामाभिधानाने पावन झाले. येथेच माऊलींनी आपले पुढील संपूर्ण आयुष्य “संसार करून परमार्थ साधा” ह्या आपल्या भक्तांसाठी बोधप्रद ठरलेल्या, आपल्या उक्तीनुसार व्यतित केले व मानवी अवतार कार्याची समाप्ती केली.

ॐ कारांनी ह्या युगातील (सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आताचे हे शेवटचे कलीयुग) आपल्या मानव अवतार कार्याची स्थिती ही राजमहालात किंवा अती उच्च कुळात न करता, सर्वसामान्य जनते सारखी कोंकण परिसरातील एका क्षत्रिय कुळातील शेतकरी कुटुंबात केली आणि सामान्य जीवन जगून, असामान्य कर्तृत्व करून कलियुगाच्या नाशाचा पाया रचून, सत् युगाचा प्रारंभ केला.

You cannot copy content of this page