श्री समर्थ मालिक - सर्व समर्थमय करावयाचे असेल तर संसार नेटका केलाच पाहिजे. ज्याचा संसार नेटका नाही, ती ज्योत गतीमान होणारं नाही. शांती मिळणार नाही. माया आणि ज्योत यामध्ये संघर्षात जी ज्योत आहे, ती स्थिर होऊ शकते. मायेला स्थिर करीत नाही, तोपर्यंत स्थिर होईल कसा?
जोपर्यंत सत् ओळखले नाही, तोपर्यंत सत् नाही. म्हणून सताचे…
श्री समर्थ मालिक - आत्ताची जी भक्ती आहे ती कशासाठी? तर जो मानव करील, त्याच्याचसाठी ती आहे, अन् ती भक्ती त्याच्याच बरोबर असते. दोन्ही उभयता जरी असलात तरी नवऱ्याने केली ती बायकोला नाही अन् बायकोने केली ती नवऱ्याला नाही.
आता सांगा, या दरबारात एकाच घरात एकाच कुटुंबात किती सेवेकरी आहेत? त्यांचीच वळणे पहा. सताच्या…
मी कोठे आहे हे त्यांना डोळस झाल्यानंतरच समजेल. हे सर्वस्व कोण करील? तर आकारच करील. अशा तऱ्हेने ॐ कार स्वरूप बनला की मग सत मार्गाने वाटचाल करील.
काही मानव आड मार्गाने जातात. लोकांना नादाला लावतात. स्वतःचे स्वहित साधतात, पण या ढोंगाने किंवा चमत्काराने मी कधीही सापडत नाही, मिळत नाही. मला रंग, रूप, आकार वगैरे…
श्री समर्थ मालिक - आरतीचे वेळेला सर्व सेवेकरी ललकारी म्हणतात, तिचा अर्थ सेवेकऱ्यांनी केला तर कळेल. ॐ कार बीज मात्रेन नित्यं ध्यायंती योगिन: | कामदम् मोक्षदम् चैव ॐ काराय नमो नमः ||
हा कोण याची ओळख करून, स्वतःची दृष्टी हि तेजोमय करून योग्याला पाहण्याचा प्रयत्न करा. तो योगी कुठे आहे, हे सेवेकर्यांनी विसरता…
दिनांक: १६ डिसेंबर १९७२ रोजी साजरा करण्यात आलेल्या श्री सद्गुरु भंडारा उत्सवावेळी श्री समर्थ मालकांनी दिलेले शुभसंदेश -
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी हा सुख सोहळा अधिक आनंदी वातावरणात साजरा होत आहे याबद्दल चिंता नको. माझा मीच आनंदात होतो. सेवेकर्यांनी शुद्ध भावनेने केलेली सेवा चरणांवर रुजू होत असते. रुजू करून घ्यावी लागते. ज्याप्रमाणे वर्षानुवर्षे या वातावरणाच्या त्रिवेणी संगमात…
श्री समर्थ मालिक – “एक तत्त्व नाम दृढ धरी मना |” जो आपली भावना दृढ धरून, त्या तत्त्वाशी ठाम राहू शकतो, एक सेकंद सुद्धा इकडे तिकडे ढळत नाही, तो सेवेकरी कदापिही वाया जाऊ शकणार नाही आणि जाणारही नाही, पण मनाची चंचलता वाढली तर मात्र त्याचे त्याने समजावे. मी सांगण्यात अर्थ नाही.
शरीर हे जडत्व…
प्राण सर्वस्व अर्पण केलेल्याची गती कशावरून दिसून येते, त्याची स्थिती कशी ओळखली जाते? तर त्याच्या चेहऱ्यावरचे तेजच वेगळ्या तऱ्हेचे दिसते. त्याला एका भगवंताशिवाय काही दिसत नाही. त्याच्या प्रकृतीवरचे, तोंडावरचे तेज सात्विक दिसते. म्हणून त्या तऱ्हेची कृती झाली, तरच प्राण अर्पण केल्यासारखे होते. “सगुनाचा सार घेणे यातच सर्वस्व आहे.”
संसारात राहूनच हे कोणाचे कृपेने चालले…
प्राण सर्वस्व अर्पण केलेल्याची गती कशावरून दिसून येते, त्याची स्थिती कशी ओळखली जाते? तर त्याच्या चेहऱ्यावरचे तेजच वेगळ्या तऱ्हेचे दिसते. त्याला एका भगवंताशिवाय काही दिसत नाही. त्याच्या प्रकृतीवरचे, तोंडावरचे तेज सात्विक दिसते. म्हणून त्या तऱ्हेची कृती झाली, तरच प्राण अर्पण केल्यासारखे होते.
“सगुनाचा सार घेणे यातच सर्वस्व आहे.” संसारात राहूनच हे कोणाचे कृपेने चालले…
श्री समर्थ मालिक - देवाचे सख्यत्वासाठी | पडाव्या जिवलगांसी तुटी ||सर्व अर्पावे शेवटी | प्राण तोही वेचावा || (दास.४.८.८)
एकाच्याच ध्यानासाठी, एकाच्याच नामासाठी, एकाच्याच सख्यत्वासाठी ते कसे करावयाचे? त्यांना आपलेसे कसे करावयाचे? हे जर सापडले, तर हेवेदावे, मदमस्तर निर्माण होईल का? एकाच तत्त्वावर ठाम राहिला तर भटकण्याची आवश्यकता काय? ज्योतिष, राशिभविष्य पाहण्याची काय आवश्यकता? …
पूर्वी मी जी स्थिती त्या ठिकाणी करीत होतो, ती आपल्या सांगण्यावरून बंद केली. पैसेवाले हौसेने येतात. नादान वृत्तीचे गवसे पण येतात. साध्या भोळ्या भाबड्या स्त्रिया येतात. या गवशांचे लक्ष त्यांच्या दागिन्यांवर असते. तेव्हा पंढरीची स्थिती अशी आहे. त्या ठिकाणी काहींचे मुडदे देखील पडलेले आहेत. मग मरीला संदेश देऊन ठेवले होते, ते कशासाठी ठेवले होते? सद्भक्त…
श्री विठ्ठल - देही अन् विदेही बनवितो कोण? अज्ञानी मानवांना हे काही समजू शकणार नाही. सत तत्व जे आहे, ते फार दयाघन आहे. जडत्वाने नटलेल्या मानवांना ह्याचे पूर्वीचे गाठोडे पाहून सानिध्यात घेतले आहे. कोणत्याही मानवाची मनोभावना असते, भक्ती करतो, नामस्मरण करतो, ते मी करतो. यातूनही परमेश्वर मला भेटत नाही, म्हणून परमेश्वर हे तत्व कोठे आहे…
ज्या आकाराला शरण तेच ॐ कार स्वरूप आहेत म्हणून,ॐ कार बीज मात्रेण | नित्यम् ध्यायंती योगिन: ||कामदम् मोक्षदम् चैव | ॐ काराय नमो नमः ||
ॐ कार हे बीज कसे आहे? तेच ते स्वयं तत्व ॐ कार स्वरूप नटलेले आहे. तेच निर्विकार, निराकार असे आहे. म्हणून आकारातच निराकार आहे. म्हणूनच त्याचे वर्णन होत आहे. ॐ…