समर्थांचा जो सेवेकरी आहे, जो सत आहे, तो सत् मार्गाने जाण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याला समर्थांशिवाय, एकाच तत्त्वाशिवाय काही दिसत नाही. असा सेवेकरी अह:र्निश चरणात लिन झालेला असला म्हणजे त्याला एखादा शत्रू, चोर, सावज कोणी जरी असले, तरी अशा सेवेकऱ्यावर चाल करतात, नाही का? तर नाही. समर्थांच्या सेवेकर्यावर कोणाचेही काही चालत नाही. चालू शकत नाही.…
सेवेकऱ्याच्या, भक्ताच्या अंगी लिनता असली पाहिजे. जो खरोखरीच लिन झाला आहे, त्याला तहान, भूक, मान, अपमान काही नाही, असा सेवेकरी झाला, मग मात्र त्याला मी जवळच आहे. मग बीजदाता कोण आहे, ते त्याच्या हाती बरोबर मिळेल. असा जर बीजदाता सापडला, तर उपरी बीजाचा उपयोग होईल काय? अशी बीजे निर्माण झालेली, जातात किती आणि येतात किती,…
सर्व ठिकाणी व्यापक, सर्व भूतेषु मी आहे, हे ज्याने ओळखले, जाणले तो सेवेकरी कसा असेल? माझ्याशी कोण बोलतो त्याची तो विवंचना करील. जडत्व मानव बोलतो आहे का? कोण बोलतो आहे? सर्व व्यापक, सर्व भूतेषु मी आहे हे जर जाणले, तर त्या पात्रतेची उत्तरे तो देऊ शकतो.
मातीचे ढेकुळ पाण्यात विरघळते, त्याप्रमाणे सेवेकरी पाण्यासारखा कधी…
पुण्यस्मरण दिन कार्यक्रम - मुळाश्रम
(१) श्री सद्गुरु माऊली पूजा सकाळी ०९:०० पासून सुरू होऊन
(२) श्री सद्गुरु माऊलींचे नामस्मरणाने व
(३) सकाळी ११:०० वा. नंतर ॐ कार उच्चारण तथा श्री सद्गुरु माऊलींचे नामस्मरण (सामुदायिकरित्या) तसेच
(४) श्री ११:१५ गुरु गीता पठण (सामुदायिकरित्या) करण्यात येऊन
(५) …
🙏 श्री सद्गुरु माऊली पुण्यस्मरण दिनानिमित्त समस्त श्री भगवान महाराज परिवारातर्फे श्री सद्गुरु माऊली कमलचरणी विनम्र वंदन......!!! 🙏
श्री समर्थ मालिक – “आधी बीज एकले | आधी बीज, त्यानंतर फळ! फळात परत बीज निर्मिती! त्याचा मानव उपभोग घेतो. मुळात बीज कोठून निर्माण झाले? बीजाची पैदास कोठून झाली? त्याचा मानवाने शोध घेतला आहे का? “आधी बीज एकले” ……… असे संताने म्हटलेले आहे, पण ते बीज कोठून आणि कसे निर्माण झाले, कोणी दिले, याची कल्पना…
श्री समर्थ मालिक एकचित्त – कुंभाने जे सांगितले, ते हे अघोर पद नव्हे कि, प्रणव टाकल्या टाकल्या एखाद्या मानवाला प्रकृतीवर विकृत करणी करून तो झटतो, ते हे तत्त्व नाही. हे मी केव्हाही करणार नाही. असे करू शकणार नाही.
हे तत्व फार न्यारे आहे. माझा अंत कोणीही घेणार नाही. माझा अंत सापडणे दुरापास्त आहे. मी…
महामुनी कुंभ - अकार, उकार, मकार हे रज, तम, सत्व आणि याला जोडून ७२ नाड्या. ७२ च्या ठिकाणी ३६ कोटी गण. यावर आरुढ झालेले स्वयमेव तत्व ! हे काय करील व करून घेईल याचा अंत नाही. तेच कर्तव्य करून घेत आहेत. मी काही करत नाही, फक्त कर्तव्य करून घेतो असे म्हणणे आहे ते सत्य आहे.…
श्री समर्थ मालिक - नाते म्हणजे तरी काय? नाते म्हणजे संबंध. हा संबंध कशा तर्हेने असतो? ज्या सत् पदापासून बीजारोपण झाले, त्याचाच अंश म्हणजे मानव प्रकृती होय. हे सत् सानिध्य असेल, तर हेच सानिध्य घेत घेत अनेक जन्म घ्यावे लागतात.
प्रत्येक जन्माच्या सानिध्यात एकमेकांची जाणीव नसते. सर्व नात्यात, आई व मूल हे नाते श्रेष्ठ…
गुरुतत्त्व आणि सेवेकरी हे लागेबांधे फार वेगळ्या तर्हेचे आहेत. ज्याने ओळखले तो धन्य होय.
सेवा आणि सेवेकरी म्हणजे काय? ती कशी करावयाची? याचे निवेदन झाले आहे. सेवेकरी आपल्या सद्गुरुंना देऊन देऊन काय देणार आहे? सद्गुरुंनी काय अपेक्षा केली? तेव्हा गुरुतत्त्व हे असे आहे. त्याचा अंत:पार नाही. त्यांच्या मुखातला एक कण जरी झेलला, तरी तो…
श्री समर्थ संदेश – गुरुपौर्णिमा सत् शुद्ध अंतःकरणाने प्रेरित होऊन सद्गुरू चरणांवर बहाल केलेली सेवा थोडी का असेना ही पूर्णत्वाने रुजू आहे. हे करताना सेवेकरी आतून आणि बाहेरून हेलावून गेला पाहिजे. करायचे म्हणून करायचे, हे ओझे म्हणून ठेवले आहे म्हणून करायचे, तर हे केलेले चरणांवर रुजू होत नाही, पण अंतःकरणापासून आपण केले, तर ते प्रेमभराने…