Skip to content Skip to sidebar Skip to footer

Author page: Admin

अवतार कार्याचे निरुपण….©️

ज्या वेळेला मानवांची गती विचित्र होते त्यावेळी अवतार कार्य नटवावे लागते. मानव प्रथम शुद्ध असतो, परंतु अनेक विचित्र गतीची त्याला पुटे चढत असतात, त्या वेळेला सताला तो विसरतो. मानव हा विचित्र गतीने जाणार ही सताला चिंता असते. त्याचवेळी अवतार कार्य नटवावे लागते व ती स्थित्यंतरे साफ करावी लागतात. आता हे अवतार कार्यच चालू आहे.…

Read More

निर्मिती द्वारांचे गुह्य ©️

श्री समर्थ अलक - त्रिगुणांवर पृथ्वीची उत्पत्ती आहे. त्रिगुण हे एक वर्तुळ आहे. त्यांची तीन द्वारे - प्रवेशद्वार, मध्यद्वार आणि अंत्यद्वार ! अशी तीन द्वारे त्यात उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन भावना, त्यात तीन अंकुर ! वर्तुळद्वार ही टोके, यातूनच सर्वस्व निर्माण झाले. त्याच्याही निराळे एक बीज, ते त्रिगुणात गुरफटले नाही अन गुरफटणार पण…

Read More

ॐकार बीज ©️

जगाच्या उत्पत्ती पासून ॐ या बिजाचे बिजारोपण झाले आहे. ॐकार बीज प्रथमच निर्माण केले आहे. हेच सद्गुरु सर्वांठायी विखुरले आहेत. आज त्याचीच उपासना करावयाची आहे. ही भूमी शापदग्ध असल्यामुळे, जरी सर्वस्वी आनंदात होते, तरी दुसऱ्याचे बंधनात असल्यामुळे तल्लीनता नाही. ही भूमी मुक्त झाल्यामुळे आता तल्लीनतेत आहेत. याला फारच महत्त्व आहे. आपल्या सद्गुरूंना डोळे भरून…

Read More

महाशिवरात्र ©️

(म्हणूनच त्यांना महा असे म्हटलेले आहे....) श्री स्वयंभू - मी प्रत्यक्ष शिव आहे असे मी म्हणू शकत नाही, कारण मी स्वयमेव नाही. मलाही कोणीतरी निर्माता आहे. आम्ही सुद्धा त्यांच्याच ध्यानात, लहरीत असतो. त्यांनीच आम्हाला घडविले आहे. त्यांनीच आमचे नामाभिधान ठेवले आहे. आकारालाच ओंकार म्हटले आहे आणि ओंकारालाच आकार म्हटले आहे. म्हणून ते म्हणत असतात, "कोणीही…

Read More

अनुग्रह सताचा ©️

सद्गुरु बाबा : आम्ही एक बिंदू! आपल्या चरणावर स्थिर होण्यालायक आहे का? नर्मदा निवासी : मान्य आहे. आता जे सत सानिध्यात मानव आहेत त्यांनी समजून घ्यावे. दोनच प्रणव ! सेवेकरी अन सद्गुरू!! मालिक : ज्यावेळी अघोरांनी कुरघोडी केली त्याच वेळेला लक्षात आले की कोणाकडून कर्तव्य करावयास हवे? अखंड महाराष्ट्र शोधला. मग आपण कुठे…

Read More

सत आसन दिशा ©️

नर्मदा निवासी: मग आताचे मानव! ते मानवच आहेत ना? सद्गुरु बाबा : पण ही चौकट त्यावेळी होती ना? नर्मदा निवासी : आम्ही हे प्रश्न का विचारले? पूर्वी हे आसन पूर्व पश्चिम अन आता दक्षिणोत्तर आहे. त्याच काळात चौकटाने कुरघोडी केली. त्यावेळी बहुतेक मानव अहंकारी नव्हते. या काळात एकही मानव असा सापडणार नाही की त्याच्याजवळ अहंकार…

Read More

आसन स्थापन…©️

नर्मदा निवासी : ज्यावेळी प्रथम आसन स्थापन झाले ते कसे स्थापन झाले? सद्गुरु बाबा : मुंबईतील कॉटन ग्रीन पासून सुरुवात आहे. लोक विक्षिप्त पण त्यांना मानवात आणले. नर्मदा निवासी : प्रथम आसन कोणत्या दिशेला होते? सद्गुरु बाबा : आसन पूर्वाभिमुख होते. आता उत्तराभिमुख आहे. नर्मदा निवासी : त्यावेळी मानव कसे होते याची आपणाला…

Read More

संवाद…अलकांशी-२ ©️

सद्गुरु बाबा : शेषावर पहुडले आहेत ते कोण? (क्षिराब्धी) अलक : ज्याप्रमाणे आम्ही अन ॐकारेश्वर (निराकार आणि आकार); त्याप्रमाणे ॐकारेश्वर अन क्षिराब्धी; त्यानंतर त्रिगुण अन तिन्ही शक्ती. (येथे आम्ही म्हणजे अलक - सत्! अलकांपासून (निराकारा पासून) ॐकार ! आणि ॐकारांपासून ॐकारेश्वर म्हणजेच आकार ! ह्याचाच अर्थ निराकारा नंतर आकार !) ॐकारेश्वरांनी कर्तव्यासाठी निर्माण केले क्षिराब्धी…

Read More

संवाद…अलकांशी ©️

सद्गुरु बाबा : आपण परमपद आहात. सतपद आहात अन ते विशाल असून अलिप्त आहे. तेव्हा आपल्या प्रणवाचे महत्त्व त्रिकालबाधित असून सत आहे. आपण कुठेही जात नाही कार्य करून घेता. हे आपले प्रणव आहेत.  अलक : मान्य आहे.  सद्गुरु बाबा : हे आसन कोणाचे आहे? अलक निर्गुण निराकार हेच सत ! आपले प्रणव आहेत. मग हे…

Read More

संवाद तुकारामांशी…©️

श्री संत तुकाराम महाराज () सद्गुरु बाबा : चैतन्यात लय झाल्यानंतर दर्शनाची अपेक्षा असते का? (चैतन्यात लय येणे स्थिती - स्थूल, सुक्ष्म, कारण, महाकारण अशा स्थितीने भक्ताला भगवंत आपल्यात सामावून घेतात ती स्थिती) संत तुकाराम : चैतन्यात मी लय कसा, तर (आपल्याच) ध्यानात असतो. (येथे तुकाराम महाराज हि स्थिती स्पष्ट करताना म्हणतात, जरी मी चैतन्यात…

Read More

कालचक्र गती ©️

श्री समर्थ मालिक - कर्मसंचित हे कोणालाही सुटलेले नाही. कर्मसंचितावरच सर्व आधारलेले आहे. ते मानवांनाच काय पण तत्त्वांना अन मला पण सुटलेले नाही. हे कालचक्र आहे. या कालचक्राची गती ज्याप्रमाणे फिरेल त्याप्रमाणे मानव या कालचक्रात सापडला की मग मी कोण याची जाणीव त्याला राहत नाही. सद्गुरु सानिध्यात असलेल्या ज्योती वाहणार नाहीत. वाहू लागल्या…

Read More

मार्गदर्शन मालकांचे…©️

श्री समर्थ मालिक - १)  सत भक्तांना काही विषय बहाल केले आहेत. त्या विषयात ते जर रममाण झाले तर दुसऱ्या कोणत्याही विषयांची जरुरी नाही. या विषयासाठी सेवेकर्‍यांनी किंवा सत भक्तांनी पण लक्ष ठेवणे.  २)  सेवेकरी आपली वाटचाल करताना, अघोरांच्या सानिध्यात जातो. अजून काही सेवकऱ्यांचे चुकते आहे त्यांनी सुधारावे, नाहीतर महान गुन्हा समजला जाईल.  ३)  जोपर्यंत मन…

Read More

You cannot copy content of this page