श्री संत तुकाराम – सताने म्हटले आहे की ही दृष्टी सगुण रूपात निमग्न होऊ दे. त्यातच सर्व काही होईल. सगुणा पासून दृष्टी लांब घालवू नको. म्हणूनच म्हटले आहे, सगुणाचा सार येणे नाम संसार ! म्हणजे सगुण पाहता पाहता भक्त निर्गुणाप्रत आपोआप जातो.
जो माझे माझे म्हणतो, हे मी केले, ते मी केले म्हणतो, तो कधीही निर्गुणाप्रत जाणार नाही, त्याला निर्गुणाप्रत जाऊ देणार नाही. पण तो काय करतो आहे, काय घेतो आहे, काय नेतो आहे हे त्याला कळलेले नाही. मग माझे माझे का म्हणतो तेही त्याला कळत नाही.
जन्माला फेकल्यानंतर तो कसा असतो? कर्माच्या शाखा दोन – सत् आणि असत ! मग असत मार्गाने गेल्यानंतर तो पूर्ण बध्द झाला, मग तो जन्माला आला काय आणि नाही आला काय, सारखाच ! समर्थ आपल्या ऋणातून मुक्त होतात. त्याला मानव जन्म देतात, पण तो पुढे मायेच्या आधीन बनून असत मार्गाने जातो. मग करतो ते सर्वस्व मीच करतो आणि अशा तऱ्हेने त्याचा आवाज कथला प्रमाणे बद्ध निघतो. त्यामुळे तो सर्व विसरून जातो. त्याला जगात दिसते तेच प्यार वाटू लागते. त्यामुळे तो सत मार्गाने जाऊ शकत नाही. पूर्वजन्मीच्या रंग ढंगाप्रमाणे तो जातो. त्याला सत् सानिध्य सापडत नाही. ©️