Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

या सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरु हा राजमार्ग आहे. त्या मार्गाने, सर्वस्व आपली कर्तव्ये सांभाळून गेला, तर जन्माला आल्याचे सार्थक होते. …

अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात …

संदेश हे संक्रमण होणारच आहे. त्याशिवाय भूतलावर सत्य, असत्य किती आहे हे सांगता येणार नाही. असत्याने आपला कितपत पगडा टाकला आहे व …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

या सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरु हा राजमार्ग आहे. त्या मार्गाने, सर्वस्व आपली कर्तव्ये सांभाळून गेला, तर जन्माला आल्याचे सार्थक होते. …

अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात …

संदेश हे संक्रमण होणारच आहे. त्याशिवाय भूतलावर सत्य, असत्य किती आहे हे सांगता येणार नाही. असत्याने आपला कितपत पगडा टाकला आहे व …

संसाराचे सार ©️

संसाराचे सार ©️

श्री समर्थ मालिक – जो नारायणाच्या ध्यानात तल्लीन झाला त्याला सुखदुःखाचे वर्णन करता येणार नाही. त्याला त्याची वाक्यरचना करता येणार नाही. सुखदुःख कशाला म्हटले आहे? आत्ता तुम्ही या ठिकाणी आलात मग दिवसभर काय करता? कोणाला सुख आहे? ज्याच्या घरी कोट्यांनी संपत्ती आहे तो तरी सुखी आहे का? जो रात्रंदिवस दोन मिनिटे म्हणा, दोन सेकंद म्हणा माझ्या ध्यानात तल्लीन झाला तरी तो सुखी आहे. प्रत्येक सेवेकर्‍यांने असे होण्याचा प्रयत्न करा. मग नारायणावर बोल ठेवावा की न ठेवावा हे सर्वच सेवेकऱ्यांना कळेल.

या दरबारचे सेवेकरी अनुभव घेत आहेत. तेव्हा या चरणांवर थोडेसे सांगितले. यावर विचार करा. मग दोष कोणाचा आहे? करावे तसे भरावे असे जर नसेल, तर मायेला चेतना नाही दिली, तर व्यवहार चालणार नाही. सेवेकरी कृतीत उतरविणार नाही. मायावी रूपातच संसाराचे सार आहे. याच्या रहित मानवाला ठेवल्यानंतर तो संसार करणार नाही. पण माणसे स्वतःच खड्ड्यात उतरतात. पापाचे डोंगर साठवितात. याकरिता त्याला जन्माला घातला नाही. मानव हाच जगात, त्रिभुवनात श्रेष्ठ आहे. म्हणूनच तो माझ्या ध्यानाचा, नामाचा, वर्णनाचा उहापोह करतो. म्हणून मानव धर्म, मानव जन्म पवित्र आणि श्रेष्ठ आहे. ते श्रेष्ठत्व टिकविण्याचा प्रयत्न करणे आद्य कर्तव्य आहे. त्याप्रमाणे वाटचाल करणे. नारायणाला बोल द्यावा न द्यावा हे सेवेकऱ्याने पाहणे. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page