Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

मानव जन्माची स्थित्यंतरे -३-©️

मानव जन्माची स्थित्यंतरे -३-©️

रामदासांचे उदाहरण घ्या. रामदासांना थंडी वाजून आली, त्याच वेळेला शिवाजी महाराज त्यांना भेटावयास आले. रामदास स्वामी आसन सोडून बाजूला झाले. दोघे भेटत असताना, फक्त ते आसन हलू लागले. कापू लागले. शिवाजीला आश्चर्य वाटले. त्याने विचारले, “महाराज हे काय?” “हे प्रारब्ध आहे. आपण भेटायला आलात, आपले बोलणे, भाषण व्हावे म्हणून त्याला बाजूला ठेवले.

त्यांना ते घालविण्याची ताकद होती. पण आज ना उद्या ते भोगावेच लागले असते म्हणून प्रत्येक सेवेकऱ्याने याची आठवण ठेवून सत् मार्गाने जात असताना जर अडचणी आल्या, प्रसंग आले तरी धैर्याने तोंड देऊन वाटचाल करा. प्रत्येक ज्योत प्रारब्ध घेऊनच आलेली असते.

हे आदल्या जन्मीचे संधान असते. त्याची काळजी करावयाची नाही. आसना सानिध्यात असणाऱ्या ज्योती भाग्यवान आहेत. सानिध्य मिळणे कठीण आहे. एक-एक, दोन-दोन तपे झाली, त्यांना मिळत नाही. पण तुमच्या प्रारब्धाने ते मिळते आहे. श्रीमंत सावकार व्हाल, सम्राट व्हाल, परंतु आसन व सद्गुरु सानिध्य हे मिळणे दुरापास्त आहे. हा अमूल्य ठेवा मिळाला त्याचा अह:र्निष उजाळा करून जतन करा. हीच महान इच्छा आहे. (समाप्त)

You cannot copy content of this page