Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

सत कर्तव्यापासून दूर…..(२) ©️

सत कर्तव्यापासून दूर…..(२) ©️

हे सर्वस्व तुमच्या कृतीच्या आधीन आहे. पण याच्या उलट, दृश्य धन लाभल्यावर त्याला इतरांची किंमत वाटत नाही. ओळख रहात नाही. त्यात तो एवढा गुरफटतो कि, त्याला वाटते हेच सर्वस्व परब्रम्ह आहे. यातच सर्वस्व स्थावर जंगम संपत्ती आली. या व्यक्त धनासाठी कोर्ट कचेऱ्या, भानगडी वाढतात. भांडणे होतात. एवढे जरी झाले, तरी व्यक्त धन त्याच्याबरोबर जाते कां? 

आपल्या या भूमीत आपले पूर्वज होऊन गेलेत. त्यांनी कितीसे धन आपल्याबरोबर नेले? धन तरी त्यांच्याबरोबर गेले कां? नाही. जाताना जे दृश्य धन आहे, संपत्ती आहे, ती सुद्धा बरोबर येत नाही. म्हणून हे सर्वस्व झूट आहे. झूठा पसारा आहे. कोणीही कोणाचे नाही. म्हणून निष्काम व्हा ! संपत्ती मिळाली म्हणून वाटेल तशी उधळू नका. ज्याचे प्रथम घर समाधानी, तोच समाधानी असतो. म्हणून संचिताप्रमाणे कितीही संपत्ती मिळाली तरी तिचा योग्य तर्‍हेनेच उपयोग करा. याचा अर्थ असा नव्हे कि, व्यक्त संपत्तीला लाथाडणे.

स्थुलाला व्यक्त संपत्तीची जरूर आहे. हे जरी आहे, तरी आपल्या प्रारब्धाप्रमाणे आपल्यावर अवलंबून असणाऱ्या ज्योतीचा सुद्धा त्यात हिस्सा आहे. त्यांना सांभाळूनच स्थिर ठेवावे लागते.

मन स्थिर राहण्यासाठी धनाची आवश्यकता लागते. म्हणून धन पाहिजे. संचिताप्रमाणे ते मिळेल. देणारच ! पण धनाचा लोभ असता उपयोगी नाही. साठवा, बँकेत ठेवा, पण सत् कार्यी लावा. हाव धरू नका. धन मिळते ते एकाचेच नाही, तर तुमच्या सानिध्यात ज्या ज्योती असतात त्यांचा पण हिस्सा असतो. पशुपक्षी बघा ! त्यांना जे मिळेल ते आपल्यावर अवलंबून असणाऱ्या ज्योतीना भरवतात. त्यांचे उदाहरण नजरेसमोर ठेवण्यासारखी नाही कां? म्हणून दृश्य संपत्तीमुळे किती घरांचे वाटोळे झाले आहे. त्यामुळे भांडणे होतात. वाद वाढतात. कितीही परममित्र असला तरी धनामुळे तो शत्रू बनतो. एवढे खरे की, दृश्याला दृश्याची जरुरी आहे. ©️

(समाप्त)

You cannot copy content of this page