Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

या सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरु हा राजमार्ग आहे. त्या मार्गाने, सर्वस्व आपली कर्तव्ये सांभाळून गेला, तर जन्माला आल्याचे सार्थक होते. …

अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात …

संदेश हे संक्रमण होणारच आहे. त्याशिवाय भूतलावर सत्य, असत्य किती आहे हे सांगता येणार नाही. असत्याने आपला कितपत पगडा टाकला आहे व …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

या सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरु हा राजमार्ग आहे. त्या मार्गाने, सर्वस्व आपली कर्तव्ये सांभाळून गेला, तर जन्माला आल्याचे सार्थक होते. …

अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात …

संदेश हे संक्रमण होणारच आहे. त्याशिवाय भूतलावर सत्य, असत्य किती आहे हे सांगता येणार नाही. असत्याने आपला कितपत पगडा टाकला आहे व …

कर्ता करविता……©️

कर्ता करविता……©️

आपण सर्वस्व दृश्य आहोत. जडत्व आहोत. दृश्य हे सर्व जग आहे. चर अचर सुद्धा दृश्य आहे. ज्याला हालचाल नाही ते निर्जीव आणि ज्याला हालचाल आहे, ते सजीव. हे सुद्धा दृश्य आहे. आपल्या गेल्या जन्मीचे जे प्रारब्ध त्याप्रमाणे या योनीत सत फळ मिळत असते आणि ते समर्थ देतात. समर्थ म्हणतात, “मी कोणाचाही ऋणी नाही. ज्याच्या त्याच्या संचिताप्रमाणे मी फळ देत असतो.” दृश्याला दृश्य फळाची आवश्यकता आहे.

वयाच्या १८ व्या वर्षी लग्न होते. मग हालचालीला सुरुवात होते. मग खोलीची जरूर भासते आणि त्याप्रमाणे धन मिळाले की, हालचालीला सुरुवात होते. याप्रमाणे दृश्याला दृश्याची आवश्यकता आहे. पण, प्रथम नि:ष्काम गती पाहिजे.

मी जरी काम करतो, काम करण्यासाठी मजूर लावतो, घरे बांधतो, दगड लावतो तरी हे माझे काही नाही. सर्वस्व भगवंताचे आहे. मी निमित्त मात्र आहे. इतकी जरी धारणा झाली, तरी गती नि:ष्काम होते. मग सर्वस्व आपोआप जाग्यावर येते. पण नि:ष्काम धारणा ठेवली पाहिजे. पण, याच्या उलट स्थिती झाली तर मन बेचैन होते. पण दृश्यातच राहून, दृश्याशी खेळ खेळत स्थिर व्हावयाचे आहे. सर्व ऋषीमुनी होऊन गेले. त्यांची धारणा नि:ष्काम होती. ते म्हणत, “कर्ते, करविते निराळे आहेत. आम्ही निमित्त मात्र आहोत. सर्वस्व त्यांच्याच कृपेने होते.”©️

You cannot copy content of this page