Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

या सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरु हा राजमार्ग आहे. त्या मार्गाने, सर्वस्व आपली कर्तव्ये सांभाळून गेला, तर जन्माला आल्याचे सार्थक होते. …

अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात …

संदेश हे संक्रमण होणारच आहे. त्याशिवाय भूतलावर सत्य, असत्य किती आहे हे सांगता येणार नाही. असत्याने आपला कितपत पगडा टाकला आहे व …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

या सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरु हा राजमार्ग आहे. त्या मार्गाने, सर्वस्व आपली कर्तव्ये सांभाळून गेला, तर जन्माला आल्याचे सार्थक होते. …

अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात …

संदेश हे संक्रमण होणारच आहे. त्याशिवाय भूतलावर सत्य, असत्य किती आहे हे सांगता येणार नाही. असत्याने आपला कितपत पगडा टाकला आहे व …

स्वयंभू ! (२) ©️

स्वयंभू ! (२) ©️

त्यांची अर्धांगिनी आली होती. जाणीव घेतली होती ना? ती दर्शना करता आली होती. जर या शक्तीला पाहू शकला नाहीत, तर पुढें वाटचाल कशी करणार? ही शक्ती दर्शना करता आली होती. काही त्यांचे उपासक आले आहेत. परंतु ह्या दरबारात कोणाचे काहीच चालणार नाही. त्यांना वाटत असेल की, हा दरबार मामुली आहे, ऋद्धीं सिध्दी आहेत, चमत्कार नमस्कार आहे, परंतु तसेही नाही. हा दरबार कसून पाहणारा आहे व सेवेकऱ्यानाही कसून घेणारा आहे.

सेवेकऱ्यानाही जर शक्तीची जाणीव घेता आली नाही, तर पुढे महान महान सत् पुरुष यांची जाणीव कशी घेणार? अजून स्वतःच्या गाठचे काही नाही. यापुढे तरी सावधगिरीने वाटचाल करा. कोण आले गेले त्याकडे नीट लक्ष द्या आणि ताबडतोब आसनाधिस्तां जवळ सांगा. नाहीतर पार्वती लक्ष्मी सारख्या शक्त्या माहित आहेत तुम्हाला? केव्हां चटदिशी येऊन आग लावतील याचा पत्ता नाही. त्याची फळे मग कोण भोगणार?

या सेवेेकऱ्याना जर कार्याला पाठविले, तर असेच चोख कार्य करतील काय? मग त्यांची पाहणी नको का करायला? त्या शक्तीची वटवट चालत नाही. परंतु सेवेकऱ्याना अनुभव दिला पाहिजे. त्या मायावी बाजारातच गुरफटल्या आहेत. त्या काय दरबाराचा अंत घेणार?

आपले कार्य अजून पुष्कळ पडलेले आहे. ते कार्य नको का करायला? मग असे करून कसे चालेल? याच्या पेक्षाही महान कार्ये दरबारात येणार आहेत. आता उघड करण्याचे काही कारण नाही. त्या कार्याकरिता या सेवेकऱ्याना कसून घेतलें पाहिजे. जर आता कसून घेतले नाही, तर याच गतीने वाटचाल करून पुढचे कार्य अपुरे राहील. अशा रीतीने सेवेकऱ्यानी कार्ये केली तर, गादीची इभ्रत राहील काय? ©️

You cannot copy content of this page