Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जगाच्या उत्पत्ती पासून ॐ या बिजाचे बिजारोपण झाले आहे. ॐकार बीज प्रथमच निर्माण केले आहे. हेच सद्गुरु सर्वांठायी विखुरले आहेत. आज त्याचीच …

श्री समर्थ मालिक प्रवचन (२) ©️

श्री समर्थ मालिक प्रवचन (२) ©️

मनुष्य हा प्राणी श्रेष्ठ मानला जातो. त्याने श्रुति, स्मृती, अनुभव ह्या तिन्हीचा त्रिवेणी संगम आपल्या ठिकाणी पूर्णत्वाने करणे आवश्यक आहे. या ठिकाणी सत् चित् आनंद एक क्षण का होईना, प्रकृतीच्या दृष्टीने का होईना, लुटण्यास मिळतो.

आपले कर्तव्य कोणते? कोठे गेल्याने परम निधान तत्व प्राप्त होईल? सत् स्वरूप, सत्चिदानंद या दोन्ही स्वरूपाची ओळख कोणत्या ठिकाणीं होईल? हे अजमाविण्यासाठी, याचा अनुभव घेण्यासाठी आणि याच्या प्राप्तीसाठी मायावी पसाऱ्यातून मन काढून घेतले पाहिजे. मायावी बंधने, षड्रिपूंची जाळी तोडली पाहिजेत आणि ती तोडण्यासाठी अविश्रांत धडपड करणे, सद्गुरूंना तन, मन, धनाने शरण जाणे व त्यांच्याच कृपा प्रसादाने आपल्या परम निधान तत्वाचा शोध घेणे, त्यांची जाण घेणे हेच प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे आणि याप्रमाणे प्रयत्न केला नाही तर आपल्या स्वरूपाची ओळख होणे कदापीही शक्य नाही.

सद्गुरु चरणात विलीन झाल्याशिवाय, तेथे लय पावल्या शिवाय सद्गुरूंची ओळख होणे शक्य नाही आणि ज्यावेळी प्राप्त कर्तव्ये निष्कामतेणे करीत करीत सद्गुरु चरणांत लय पावाल, सर्वस्व विसरुन जाल, त्यावेळी सताची ओळख पटेल. परंतु ते सांगता येणार नाही. सर्व त्याठिकाणी लय पावते. असे ते परम निधान तत्व आहे.

या अवतार कार्याप्रमाने मानवांचा उद्धार करण्यासाठी अनेक तत्वे निर्माण केली आहेत व ती आपआपली कर्तव्ये करीत आहेत. (२/५८) ©️

You cannot copy content of this page