Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

या सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरु हा राजमार्ग आहे. त्या मार्गाने, सर्वस्व आपली कर्तव्ये सांभाळून गेला, तर जन्माला आल्याचे सार्थक होते. …

अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात …

संदेश हे संक्रमण होणारच आहे. त्याशिवाय भूतलावर सत्य, असत्य किती आहे हे सांगता येणार नाही. असत्याने आपला कितपत पगडा टाकला आहे व …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

या सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरु हा राजमार्ग आहे. त्या मार्गाने, सर्वस्व आपली कर्तव्ये सांभाळून गेला, तर जन्माला आल्याचे सार्थक होते. …

अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात …

संदेश हे संक्रमण होणारच आहे. त्याशिवाय भूतलावर सत्य, असत्य किती आहे हे सांगता येणार नाही. असत्याने आपला कितपत पगडा टाकला आहे व …

शरण ©️

मानवाची अशी इच्छा आहे की आम्हीं शरण आहोत.

कशाकरीता शरण आहोत? कोणाला शरण आहोत?

कोणाला ईश्र्वर पहाण्याची इच्छा असते, तर कोणाला धनसंपदा मिळविण्याची इच्छा असते, कोणाला संपत्ती मिळविण्याचा उद्देश असतो, अशी प्रत्येकाचीच इच्छा वेगवेगळी असते.

कोण म्हणतं मला मुल पाहिजे, कोण म्हणतं, देवा मला सुखी ठेवा, तर कुणाची इच्छा असते मला संपत्ती पाहिजे, तर कुणी म्हणतं मी आरामशीर बसून खावे. पण यांच्यातून जो निष्काम भक्ती करील, तो मात्र आपल्या आयुष्याचं कोट कल्याण करुन घेईल.

ईश्वर कोठे आहे?

कित्येकांच्या मनाचा भ्रम असा होतो की, आम्हीं शरण आहोत, गुरू व आम्ही सारखे आहोत. त्यांना ईश्वर कसे म्हणू? त्यांना ईश्वर म्हणता येत नाही. ते ईश्वर नाहीत.

म्हणूनच म्हटले आहे की, त्या ठिकाणची ओळख नाही, तर ईश्वर कसा बरे सापडेल? मग शरण येऊन काय उपयोग? तुम्ही कोणाला शरण आलात? याच्यात अर्थ नाही. म्हणूनच कित्येकांना गुरू हे काय आहेत, याची जाणीव नाही आणि जर का जाणीव असती, तर लोक संशयात गुरफटले नसते आणि हजारो रस्त्यांनी फिरले नसते. ©️

You cannot copy content of this page