विचित्र विधानी नाना कळा खेळे | नाचवि पुतळे नारायण || ज्या मानवाचे विचित्र विधान आहे, म्हणजे पूर्वीचे संचित विचित्र आहे, त्यांचे पूर्वीचे ऋण म्हणून सानिध्यात घेतले जाते. म्हणजे तो कासावीस झालेला असतो. विचित्र भोगत्वाचा त्रास होतो. संत संगतीने त्याचा थोडा थोडा क्षय होत असतो. विचित्र विधानाचे अनुसंधनाने काय करतात? ते संचित त्याला अनुसरून नाना खेळ खेळत असतात. जर मानवाने ओळखले तर तो भाग्यवान आहे. पण मनाची भावना आणखी ठिकाणी फिरत राहिली, तर संचित वाढते. गती मिळाली असताना सुद्धा, जर मनाची चलबिचल, अदलाबदलीची भावना वाढू लागली तर तत्त्वाचा अंत लागू शकतो का?
विचित्र विधान म्हणजे काय? त्या अनुसंधनाने समर्थ बाहुल्या नाचवतात, मग समर्थांचे चुकते का? त्याचे संचित, त्याप्रमाणे समर्थ खेळ खेळतात. एवढे खेळ खेळून, तो जर मार्गावर आला, तर समर्थांच्या चाकोरीत बसेल. त्याप्रमाणे त्याला सानिध्यात घेतले जाते, पण मी कोणीतरी विशेष आहे, असे समजून अहंकाराच्या आहारी गेला, तर त्याचे त्यालाच कळले नाही. म्हणून विचित्र संचित वाढले जाते. करतो त्यावेळी त्याला काही वाटत नाही, मग पुढे डोईजड होते. अशाला सुख समाधान लवकर मिळते का? सुख समाधान कशात आहे? याचा अनुभव सेवेकऱ्यांना मिळतो की नाही? ©️