Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

या सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरु हा राजमार्ग आहे. त्या मार्गाने, सर्वस्व आपली कर्तव्ये सांभाळून गेला, तर जन्माला आल्याचे सार्थक होते. …

अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात …

संदेश हे संक्रमण होणारच आहे. त्याशिवाय भूतलावर सत्य, असत्य किती आहे हे सांगता येणार नाही. असत्याने आपला कितपत पगडा टाकला आहे व …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

या सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरु हा राजमार्ग आहे. त्या मार्गाने, सर्वस्व आपली कर्तव्ये सांभाळून गेला, तर जन्माला आल्याचे सार्थक होते. …

अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात …

संदेश हे संक्रमण होणारच आहे. त्याशिवाय भूतलावर सत्य, असत्य किती आहे हे सांगता येणार नाही. असत्याने आपला कितपत पगडा टाकला आहे व …

पडीले वळण … भाग दोन ! ©️

पडीले वळण … भाग दोन ! ©️

अघोर भक्तिने जातो, त्याला नमस्कार चमत्कार पाहायला मिळतात. तो सतापर्यंत येऊ शकत नाही. कारण इंद्रियाना वळण सत् पाहिजे. मग वागणूक कशी ठेवली पाहिजे? सत् भक्ताचे कर्तव्य कोणते आहे? घाबरू नका, उत्तर द्या. खेळीमेळीचे वातावरण आहे, तेव्हा निष्कारण वेळ घालविण्यापेक्षा अखंड तिजोरीत रममाण झाला, मग प्रकाश लांब आहे का? मग तुमची इंद्रिये इकडे तिकडे का बोकाळतात? तुमची इंद्रिये सतात निमग्न झाली नाहीत असे मी म्हणू कां? का अजून बाकी आहेत असे म्हणू? पूर्वीच्या संतांप्रमाणे जर ध्यानधारणा ठेवली तर प्रकाश लांब आहे का? कोणालाही अप्रकाशित ठेवलेले नाही. पण वाचाळता जास्त असली, तर प्रकाश कुठे आणि काय? ते सापडत नाही.

तुकोबाने म्हटलेले सत्य आहे. त्याप्रमाणे सेवेकऱ्याने विवंचना केली की त्याप्रमाणे होईल की नाही? त्या संतांनी जे म्हटले, ते सर्वांकरिता म्हटलेले आहे, नाही का? त्यांना ते दिसत होते, पण इतर ज्योतीना त्याचा अनुभव नव्हता. त्यांचा भाव निराळा नव्हता. तुकोबाला किती त्रास झाला? त्याने भोगले की नाही? मग असे का झाले? सेवेकऱ्यांनी विचार करावा. सर्वांची मते त्याप्रमाणे होती का? होय म्हणावे, तर त्यांना त्रास किती झाला? मग यातील मेख कोणी जाणली होती का? तुकोबांनी म्हणा किंवा इतर संतानी जाणली होती. पण दरबारच्या सेवेकऱ्यांनी जाणली होती का? सेवेकरी तंद्रित बसले तर त्यांना जाणता येईल की नाही?

समर्थ वाटेल ते करतील, ‌पण सेवेकरी कर्तव्यात निमग्न असेल तर समर्थांना वाव मिळेल का? तुमच्या हाताने तुम्ही तुमचे नुकसान करून घेता. वाचाळता, भंकसपणा, तुमच्या संगती येईल का? सेवेकर्‍यांनी जाणले म्हणावे तर असे का? गुरुबंधूत्वाचे नाते किती नाजूक आहे. पाठचा भाऊ हात वर करून संपत्तीचा वाटा मागावयास येतो. पण गुरुबंधू वाटा मागावयास येईल का? त्याच्या ठिकाणी किती प्रेम असते, तो डावलिल का? मग या ठिकाणी आपण कसे राहिले पाहिजे? तेव्हा गुरुबंधूत्वाचे नाते कसे आहे हे सेवेकऱ्याने ओळखून त्याप्रमाणे वाटचाल करणे. समत्वाने वागून आपल्या कर्तव्यात निमग्न राहणे. कृतीत उतरेल तेव्हा, तुकोबांच्या म्हणण्याचा अर्थ लक्षात येईल. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page