Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

या सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरु हा राजमार्ग आहे. त्या मार्गाने, सर्वस्व आपली कर्तव्ये सांभाळून गेला, तर जन्माला आल्याचे सार्थक होते. …

अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात …

संदेश हे संक्रमण होणारच आहे. त्याशिवाय भूतलावर सत्य, असत्य किती आहे हे सांगता येणार नाही. असत्याने आपला कितपत पगडा टाकला आहे व …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

या सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरु हा राजमार्ग आहे. त्या मार्गाने, सर्वस्व आपली कर्तव्ये सांभाळून गेला, तर जन्माला आल्याचे सार्थक होते. …

अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात …

संदेश हे संक्रमण होणारच आहे. त्याशिवाय भूतलावर सत्य, असत्य किती आहे हे सांगता येणार नाही. असत्याने आपला कितपत पगडा टाकला आहे व …

पंढरपूर निवासी श्री विठ्ठल ©️

पंढरपूर निवासी श्री विठ्ठल ©️

श्री विठ्ठल – मानवाला भक्तीचे अंग कसे मिळते? पूर्व जन्मीच्या संचिताप्रमाणे, परमेश्वराला पाहण्याची मानवाला इच्छा निर्माण होते आणि त्याप्रमाणे त्याची वाटचाल होते. नंतर त्याला सानिध्यात घेतात व भक्तीचे द्वार दाखवितात.

भक्तीचे मूळ दोन अक्षरात आहे. त्यातच त्रिभुवन सामावलेले आहे. सताशिवाय त्याचे स्पष्टीकरण कोणी करणार नाही. त्याचा उहापोह समजणे कठीण आहे. अशी ही गती कोणालाही नाही. जे सानिध्यात आहेत तेच रममाण होतात. इतरांना होता येणार नाही.

“भक्ती करायची म्हणून करायची, कोणी सांगितले म्हणून भक्ती मार्गाने चालू लागला, पण कष्ट नाही, काही नाही तर त्याला समर्थ भेटणे कठीण आहे. पण सताला माहित आहे कोणाला सानिध्य द्यावयाचे आणि कोणाला नाही.”

आम्हाला सुद्धा तेच आदेश आहेत. ज्याला याची ओळख त्यालाच सानिध्यात घेतात. घेतले जाते. अखंड जागृत अशी जी महान शक्ती ते सर्वस्वाची पाहणी करतात. मानवाचा उजाळा पाहतात.

मानव देऊन देऊन काय देणार आहे? मानवात काय आहे? त्या महान शक्ती पासूनच मानव निर्माण झाला. मग देऊन मानव काय देणार? मानवाला गती नाही. त्याला वाटते तो करतो, ते सर्व तो करतो. मी जर काही केले नाही, तर मला कोण आणून देणार? पण जी कर्तुम अकर्तुम शक्ती आहे तीच सर्वस्व घडवून घेते. त्याचा मानवाला अंत नाही आणि तो सद्गुरुं शिवाय कळणे फार कठीण आहे. मानव सताच्या आधीन गेला तर ईश्वर पाहता येईल.

काही गुरु चेले बनविण्यासाठी वाटेल ते सांगतात. त्याप्रमाणे तो माणूस वाटेल ते बोलतो. पण याठिकाणी अशी पद्धत नाही. कांहीं ठिकाणी आम्हाला तसे दिसत नाही. ते म्हणतात, “तन-मन-धन अर्पण केले असे म्हण.” पण तन-मन-धन हे काय आहे? ही मेख तरी मानवाला सापडली आहे का? तन-मन-धन कोण कोणाला वाहतो? म्हणून या ठिकाणी ती पद्धत नाही. त्याचे कारण काय? त्याचे कारण समर्थांनी जाणले आहे. जडाची निर्मिती माझ्यापासून आहे. मन हे सुद्धा माझ्यापासूनच आहे. तनाच्या व मनाच्या सलोख्याने कमावलेले धन कोणाचे? ते पण समर्थ म्हणतात, “माझे आहे.” मग मानव देऊन देऊन काय देणार मला? इतकेच, ज्योतीच्या भावनेची पाहणी करतात. नंतर अनुग्रहासाठी आदेश सुटतात. त्या सर्व गोष्टी ते ध्यानात ठेवतात. इतकेच की मनाला मोकळीक देतात. त्याचे कारण काय? ते त्यानाच माहीत असते.

मनाला मोकळीक दिली नाही, मन माझ्या आटोक्यात ठेवले तर सेवेकरी मानवी तऱ्हेने संसार करील का नाही ही शंका आहे. म्हणून मनाला मोकळीकता दिलेली आहे. सर्वांची मने स्थीर आहेत की नाहीत ते त्यांनीच ओळखावे. प्रत्येक सेवेकऱ्याने आपले मन सद्गुरु चरणांवर बहाल केले आहे की नाही हे त्यानेच पहावे. या आसनाच्या नियमाप्रमाणे सेवेकरी चालतात का? माझ्या भक्तीत रममाण होणारा भक्त असेल तर त्याला बडव्यांचे सोटे खाण्याची काय आवश्यकता आहे? त्या ठिकाणी हौसे, नौशे, गौसे येतात. त्यांना बडव्यांनी ठोकले तर बिघडले कुठे? ©️

You cannot copy content of this page