Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

नामस्मरण करा, तन्मय व्हा ! ©️

नामस्मरण करा, तन्मय व्हा ! ©️

अलख – नामस्मरण त्या वृत्तीचे, त्या पदाचे केल्यास, तो मार्ग आपणास मिळेल. त्यासाठी जागे झाले पाहिजे. दोन मिनीटे का होईना, सर्वस्वाचा विसर पडून, तन्मय व्हावयास पाहिजे. सेवेकरी जरी थोडे चुकले, तरी मालिक त्याला फांसावर चढवणार नाहीत. पण हे का चुकले त्याचा त्यांनी विचार करावा. शेवट शेवट हे घ्यावे लागते, म्हणजेच सेवेकरी सुधारतो. म्हणून सेवेकऱ्याने सुधारावे. जर हे शब्द वारंवार कानावर पडले, नेहमी घुमत राहिले, तर सेवेकरी सुधारतो. पडले नाहीत तर सुधारणार नाहीत.

मालकांना सर्वस्वाची जाणीव आहे. कोणत्या तऱ्हेने, कोणत्या गतीने कार्य केले म्हणजे, ते पार पडेल?

आता १९६१ साल सुरू झालेले आहे. जे बोल निघाले, ती कृती होणार आहे. त्याच्यासाठी कोणत्या रितीने वागावे, सांगण्यात येणार आहे. आपले सेवेकरी मोठे असले तरी, लहानच आहेत, असेच म्हणावे लागते. मायावी युगांत आपण मोठेच आहोत. कोणत्या ठिकाणी शांती हवी, कोणत्या ठिकाणीं त्याच तऱ्हेची उत्तरे द्यावीत हे लक्षात ठेवा. खोटे बोलावयाचे नाही. तो एवढेच म्हणेल, त्यात वाईट नाही. जो प्रश्न विचारला, त्याप्रमाणे उत्तरे द्या. त्या ज्योतीला मोठेपणा कोणत्या ठिकाणीं? ज्या दरबारात येता, त्याठिकाणी नम्रता ठेवा. त्या ठिकाणी उर्मटपणा दाखविला गेला, तर ते नामस्मरण, भक्ती सर्वस्व काढून घेतले जाते. सेवेकऱ्याने त्या तऱ्हेने वागा, वाटचाल करा. ©️

You cannot copy content of this page