Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

या सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरु हा राजमार्ग आहे. त्या मार्गाने, सर्वस्व आपली कर्तव्ये सांभाळून गेला, तर जन्माला आल्याचे सार्थक होते. …

अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात …

संदेश हे संक्रमण होणारच आहे. त्याशिवाय भूतलावर सत्य, असत्य किती आहे हे सांगता येणार नाही. असत्याने आपला कितपत पगडा टाकला आहे व …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

या सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरु हा राजमार्ग आहे. त्या मार्गाने, सर्वस्व आपली कर्तव्ये सांभाळून गेला, तर जन्माला आल्याचे सार्थक होते. …

अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात …

संदेश हे संक्रमण होणारच आहे. त्याशिवाय भूतलावर सत्य, असत्य किती आहे हे सांगता येणार नाही. असत्याने आपला कितपत पगडा टाकला आहे व …

आधी बीज एकले – भाग दोन ©️

आधी बीज एकले – भाग दोन ©️

एकच तत्व सर्व ठिकाणी व्यापक आहे, हे जर ओळखले, तर कोणते प्रणव निघतील? कोण बोलतो आहे, याचा विचार केला, तर त्या ठिकाणी कसे वागावे त्याची खूणगाठ बांधावी, तरच बीज दाता हाताशी सापडेल. त्याची ओळख होईल. ओळख झाली नसती तर या ठिकाणी रममाण झाला नसता. ओळखून सुद्धा पळवाट काढली तर त्याचा अनुभव आपल्याला अवश्य मिळेल. अनुभव असून, ओळख असून पळवाट काढली तर दोष कोणाचा? म्हणून पळवाट काढू नका. सेवेकऱ्याच्या, भक्ताच्या अंगी लिनता असली आणि जो खरोखरीच लीन आहे, त्याला तहान, भूख, मान, अपमान काही नाही, असा सेवेकरी झाला, मग मात्र त्याला मी जवळच आहे. मग, बीज दाता कोण आहे, हे त्याच्या हाती बरोबर मिळेल. असा जर बीज दाता सापडला तर उपरी बीजाचा उपयोग होईल का? अशी बीजे निर्माण झालेली, जातात किती, येतात किती, पैदास होतात किती आणि लय होतात किती? म्हणूनच आपण एक समर्थांचा कण आहोत असे समजून चालावे. याची खूणगाठ तुम्हाला मिळणार नाही. पण मानव जन्म हक्काने मिळेल. यासाठी सत मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. हे संदेश आहेत.

एका बीजापासून किती उत्पत्ती होते हे तुमच्या नजरेसमोर आहे. मुळात बीज कोठून आले आहे, कोणी फेकले आहे, याची माहिती मिळाली आहे का? मग, बीज दाता किती लांब आहे, किती अंतरावर आहे? बीजात मीच आहे. स्थुल, सूक्ष्म, कारण, महाकारणातही मीच आहे. चेतनात, अचेतनात देखील मीच आहे. मला आदी, अंत, मध्य काहीही नाही. त्या पात्रतेचा भक्त असेल तर मला कोठेही पाहू शकतो. भक्त हा सत शुद्ध पाहिजे नाही का? मग गप्पा मारून, टिंगल टवाळी करून, खवचट बोलून, अशाने मी मिळेन का?

गुरुबंधूचे नाते फार कोवळे आणि नाजूक आहे. हे एकाच मालकांचे कुटुंब आहे. एकाच पित्याची लेकरे आहेत. अशा तऱ्हेने वर्तणूक ठेवलीच पाहिजे. एका मातेच्या लेकराप्रमाणे वर्तणूक ठेवली पाहिजे. गुरुबंधूचे नाते असे आहे की, जो आपणाजवळ काहीही मागणार नाही. फक्त तुमचे प्रेम आणि आपुलकी मागणार. माझा गुरुबंधू कसा आहे, कसा नाही हे पाहण्यासाठीच, तो जवळ येतो. म्हणून शुद्ध स्फटिका सारखी वर्तणूक ठेवा. या संदेशाप्रमाणे चाला. जे महान तत्व दिले आहे, त्याचा उजाळा करा. हेच संदेश आहेत. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page