श्री समर्थ मालिक – आता आत्मरूपाची गती कोणाला माहित नाही? मग दोष कोणामुळे होतो? माझ्यापासून होतो का? ही प्रकृती जीवनाच्या मुशीत आल्यानंतर हजारो गुन्हे होतात. ते त्याच्या संचितात रुजू होतात. ते भोगत्व त्याला भोगल्याशिवाय सुटत नाही. मग पुढे दोष लावायचा कुणाला? तर नारायणाला. पण नारायण तसा ऐकणार आहे का? नारायणाचा दोषच नाही. स्वतःची चूक मानवाला दिसत नाही. तो म्हणतो, दुसऱ्याच ठिकाणी आहे त्याला उपाय काय? स्वतःची एक चूक दडविण्यासाठी दुसरी चूक करतो. म्हणजे संचित वाढते. मग हे नारायण सांगतात का? पण चुक दडविण्यासाठी लपवा छपवी, इकडचा प्रणव तिकडे असे दरबारच्या सेवेकर्यांनी करू नये. हे संदेश आहेत आणि नारायणावर दोष देऊ नये. ज्याला गती नाही त्यांनी दिले तर देऊ द्यात. काही सेवेकर्यांचे किंवा मानवांचे म्हणणे असेही आहे की, परमेश्वर सर्वांच्या हृदयी आहे. त्याने आम्हाला अशी गति का द्यावी? अशी बुद्धी का द्यावी? पण जी घडण घडते, आतून बोल सुटतात त्याकडे मानवाने लक्ष दिले आहे का? म्हणून संतांनी म्हटले आहे, नारायणाच्या नावाने ओरडून काही जमणार नाही. स्वतःच्या सुखदुःखाचा वाटेकरी स्वतःच होतो. त्यांनी ते स्वतःच निवारले पाहिजे. सत मार्गाने, सत भक्तीने मानव गेला तर संचिताचे वाटेकरी नारायण होतात व थोडासाच भाग भक्ताला भोगावयास लावतात. थोडासा मात्र जरी भोगावयास लावला तरी त्याला नको जन्म होतो. पण सेवेकरी भक्तीत परिपूर्ण रममाण असेल तर तो सुखदुःखाची व्याख्या करू शकणार नाही. पण असा सेवेकरी होणे दुरापास्त आहे. ©️
श्री राम नवमी – माझा आजचा जो अवतार दिन आहे यालाच शुभदिन म्हणतात. हजारो वर्षांपूर्वी या भारत भूमीमध्ये सत कर्तव्यसाठी जन्म अवतार …