या दरबारात एक तरी सेवेकरी काम, क्रोधाची कुरवंडी केलेला, मायेचे मूळ उपटून टाकलेला आहे असे दिसत नाही. सेवेकऱ्याने आधी केले, नंतर सांगितले तेच तुम्ही वाचता, तेच तुम्ही कृतीत आणा. सेवेकऱ्यांजवळ अजून समतेचा पाझर नाही. अजून हेवे दावे गेलेले नाहीत. अजून एकमेकांची थट्टा मस्करी करणे गेलेली नाही.
मला सांगा, एकमेकांविषयी प्रेमळपणा किती आहे? सद्गुरुं बरोबरचे…
श्री समर्थ मालिक – अविद्येचे मूळ पर ते उपडोनी सांडू | आशा मनीषा तृष्णा काम क्रोध कुरवंडू || ज्याने अविद्येचे मूळ उखडले, आशा, मनीषा, तृष्णा, काम, क्रोध यांची कुरवंडी केली, त्यांनीच हे म्हटलेले आहे. तेव्हा ते लिखाण पाहून सेवेकरी प्रयत्न करीत आहेत का? अविद्येला, मूळ मायेला उपटून टाकण्याचा प्रयत्न होईल का?
जोपर्यंत सेवेकर्याच्या अंत:र्यामी…
तुकोबाला विश्वास होता, किती जरी त्रास झाला तरी त्याने आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरविली का? तो आपल्या नादातच होता. तो कधी संपत्तीला भाळला होता का? धनद्रव्याला लुब्ध झाला होता का? कां झाला नव्हता? पण ती ज्योत कधी उपाशी राहिली होती का?
मेणाहूनी मऊ, कापसापेक्षाही मऊ असा सेवेकरी होईल, त्यावेळी त्याला कळेल. जो मेणापेक्षाही मऊ सेवेकरी…
श्री समर्थ मालिक - तुकोबाला विश्वास होता, किती जरी त्रास झाला तरी त्याने आपल्या सत् कर्तव्याला पाठ दिली होती का? तो आपल्या नादातच होता. कधी तो मायावी संपत्तीला भाळला होता का? धनद्रव्याला लुब्ध झाला होता का? कां झाला नव्हता? पण ती ज्योत कधी उपाशी राहिली होती का?
मेणाहूनी मऊ, कापसापेक्षाही मऊ असा सेवेकरी…
श्री समर्थ मालिक – मऊ मेणाहूनी आम्ही विष्णूदास | कठीण वज्रास भेदू ऐसे | भले तरी देवू कासेची लंगोटी | नाठाळाचे माथी हाणू काठी ||
मऊ मेणाहूनी म्हणजे लोण्यापेक्षाही मऊ असा सेवेकरी, संत तुकाराम याने मऊ होऊनच वज्रापेक्षा कठीण असणाऱ्या तत्वाला म्हणजे प्रकृतीला कष्ट मिळाल्यानंतर भक्ती कठीण आहे असे सांगितले. म्हणून तत्व वज्रापेक्षाही कठीण असले…
मुक्ती पेक्षा भक्ती श्रेष्ठ – जोपर्यंत स्वयंप्रकाशात सद्गुरु दर्शन मिळत नाही, तोपर्यंत मुक्ती आणि मोक्ष नाही. स्वयंप्रकाशात सद्गुरु दर्शन मिळणे हीच मुक्ती आणि हाच मोक्ष आहे. परंतु प्रथम भक्ती श्रेष्ठ ! त्यात त्याला म्हणजेच भक्ताला मुक्ती मोक्षाची गती नाही. सूक्ष्माची गती सद्गुरु देतात. मग तो सूक्ष्मात तल्लीन होतो. त्याचे सूक्ष्म त्याला दिसते. त्याच्यात रममाण झाल्यानंतर…
खरे आहे ! मन मोठे चमत्कारीक आहे. मनाच्या ठिकाणी एक दृष्टी. त्यानंतर म्हणतो, मालिक, तुम्हीच सर्वस्व करा. त्याचा तो कुटुंबासहित सुखी असतो. नोकरी तब्येत याबाबत नेहमी तक्रारी असतात.
योगी, पूर्वीचे मानव हे मनाने ठाम होते. आपण ठाम असता कां? - कधी, केव्हा? जो मनाने ठाम, तोच सतात रममाण होतो. नंतर त्याला दरबार समजू लागतो.…
श्री समर्थ मालिक – येथे दरबारात खूप प्रवचने होतात. येथे सत् सानिध्य आहे. येथे मी आहे व बाहेर पण मी आहे. परंतु जो सेवेकरी ठाम आहे, तो कोठेही असो, त्या सेवेकऱ्यास भीती नाही.
जे सेवेकरी कर्तव्यासाठी ठाम आहेत, त्यांच्याकडून कर्तव्ये करून घेतली जातात वा कर्तव्य करून घ्यावयाचे आहे. कर्तव्यात कसर नको. संशयातीत सेवेकरी येथे…
दिनांक: ०८ जुलै १९७१
श्री गुरुपौर्णिमा संदेश – आज सेवेकर्यांनी साजरा केलेला शुभ दिन सर्वस्व मान्य आहे, रुजू आहे. आजचे संदेश - सेवेकऱ्यांनी आपल्या कर्तव्यात राहणे. सेवेकरी आपल्या प्रयत्नात असतील, प्रयत्नशील असतील तर हे फार उत्तमात उत्तम आहे. आजचा हा आनंदाचा दिवस आहे.
श्री गुरुपौर्णिमा – आज सेवेकर्यांनी साजरा केलेला शुभ दिन सर्वस्व मान्य आहे, रुजू आहे. आजचे संदेश - सेवेकऱ्यांनी आपल्या कर्तव्यात राहणे. सेवेकरी आपल्या प्रयत्नात असतील, प्रयत्नशील असतील तर हे फार उत्तमात उत्तम आहे.
आजकालचा मानव हा मायावी आहे, शिवाय चोहोबाजूने व्यापलेला आहे. आजच्या या संशयी युगामध्ये मानव हा चारही बाजूने व्यापलेला आहे हे मला…
श्री विठ्ठल – या ठिकाणी त्रिवेणी संगम झालेला आहे. लिनता, नम्रता, शांती आहे. “देही देखीली पंढरी | आत्मा अविनाशी विटेवरी ||” असे एका संताने म्हटले आहे. त्याने प्रत्यक्षातही अनुभवले आहे. ज्या ठिकाणी शांती आहे, तेथे तत्त्व असणारच. जेथे तत्त्व आहे, तेथे शांती आहे. शांती हिच रुक्मिणी आहे. याच्यापेक्षा महान शक्ती आहे तिला महामाया म्हणतात. आदिशक्ती…